You are currently viewing वडूज सातारा येथे मराठी साहित्य संमेलन सोहोळा संपन्न

वडूज सातारा येथे मराठी साहित्य संमेलन सोहोळा संपन्न

.*वडूज सातारा येथे मराठी साहित्य संमेलन सोहोळा संपन्न*

( यशवंतराव चव्हाण साहित्य नगरी वडुज )अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात सस्थेतर्फे सातारा जिल्ह्यातील वडुज शहरामध्ये
राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन सोहोळा थाटामाटात संपन्न

या संमेलनाचे उद्घघाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट यांच्या हस्ते झाले. माजी न्यायाधीश ज्येष्ठ विचारवंत, लेखक रावसाहेब झोडगे यांनी संमेलानाचे अध्यक्ष पद भूषविलेआहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ कवयित्री ललिताताई गवांदे, कोल्हापूर येथील ज्येष्ठ कवयित्री रेखा दीक्षित, कराड येथील ज्येष्ठ कवी सुरेश लोहार तसेच कराड येथील ज्येष्ठ लेखक, माजी पोलिस उपायुक्त विनायकराव जाधव, मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते,तसेच नागपूर येथील सिद्धार्थ कुलकर्णी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते
तसेच, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सातारा जिल्हा अध्यक्ष बंडा गोडसे सर, म्हसवड चे म सा म् चे शहर अध्यक्ष महादेव सरतापे आणि चित्रपट निर्माता दिग्दर्शक गणेश शिंदे म सां म चे रायगड जिल्हा अध्यक्ष राजेश थळकर आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
राज्य घटनेमध्ये बदल आवश्यक आहे का? हा विषय असलेल्या परिससंवाद मधे पुणे येथील डॉ. जनार्दन भोसले आणि डॉ. निता बोडके यांनी प्रमुख पाहुणे म्हणून आपले विचार परखडपणे व्यक्त केले.
नांदेड येथील सुप्रसिध्द कवी डॉ. घनःश्याम पांचाळ यांनी कवी संमेलनाचे अध्यक्ष पद भूषविले असून उस्मानाबादच्या कवयित्री मधुरा कर्वे, पिंपरी चिंचवड येथील जयश्री श्रीखंडे, आदी प्रमुख पाहुण्यांनी नवोदित कवींना मार्गदर्शन केले.
या संमेलनाचे आयोजन कवयित्री सीमा मंगरुळे यांनी केले होते, यांच्या मयुरपंख या बालकविता संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले ,तसेच विनायकराव जाधव यांना महाराष्ट्र जीवन गौरव साहित्य भूषण हा पुरस्कार देवून गौरविण्यात आले हे विशेष होय.
राज्यभरातून लेखक कवी या साहित्यिकांची मांदियाळी जमली होती. या संमेलना मधे कराड येथील गायत्री विभुते या शिवराय बिरुदावली पुकार केले होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून वडुजच्या नगरसेविका आरती काळे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. याचं कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या साडेचारशे च्या वर प्रस्तावामधून पंधरा ते वीस लेखकाना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण, समाजभूषण आणि विद्याभूषण पुरस्कार देवून सन्मानित केले आहे
सर्व कार्यक्रम सावित्रीबाई फुले या विचार मंचावर झाला असून मुख्य प्रवेशद्वाराला डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले होते हे विशेष होय अत्यंत दिमाखदार सोहोळा यशवंतराव साहित्य नगरी येथे पार पडला.या संमेलनाचे दिलखुलास संचालन सुप्रसिद्ध अनघा जाधव यांनी केले होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × four =