You are currently viewing स्त्री सत्त्वाचा आणि स्वत्वाचा गाभा असणारा ‘अवकाश’

स्त्री सत्त्वाचा आणि स्वत्वाचा गाभा असणारा ‘अवकाश’

स्त्री सत्त्वाचा आणि स्वत्वाचा गाभा असणारा ‘अवकाश’

पाणिनी प्रकाशित ‘अवकाश ‘ हा समूह कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून शनिवार दि १५/१०/२२ रोजी नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे येथे प्रमुख पाहुण्या सुप्रसिद्ध लेखिका,कवयित्री डॉ.सिसिलिया कार्व्हालो आणि सुवर्णकमळ विजेत्या ‘श्वास ‘ चित्रपटाच्या लेखिका माधवी घारपुरे यांच्या हस्ते दिमाखात पार पडला. याप्रसंगी वृत्तनिवेदिका मा. वासंती वर्तक,संस्कृतच्या गाढ्या अभ्यासक मा. मेधा सोमण, आम्ही सिध्द लेखिका अध्यक्षा मा.पद्मा हूशिंग आणि अजेय संस्थेचे संस्थापक डॉ. क्षितीज कुलकर्णी उपस्थित होते.
कथासंग्रहात प्रा. मानसी जोशी, मंगल कातकर, अस्मिता चौधरी, प्रतिभा चांदूरकर, अश्विनी चौधरी, वर्षा फाटक व अलका दुर्गे या सात लेखिकांच्या कथा असून डॉ.सिसिलिया कार्व्हालो यांची उत्कृष्ठ अशी प्रस्तावना आहे.
प्रा. पद्मा हुशिंग यांनी ‘अवकाश’ कथासंग्रहातील कथांचा थोडक्यात आढावा सादर करून प्रत्येक कथा लेखिकांची लेखन वैशिष्ट्ये सांगितली.
प्रा. मेधा सोमण यांनी सप्ततारकांना शुभेच्छा देऊन आपल्या नम्र वाणीने मार्गदर्शन केले. मा. वासंती वर्तक यांनी सातही लेखिकांच्या स्वभावाविषयी सांगत त्याची लेखन शैलीशी सांगड आपल्या मिश्किल भाषा शैलीत मांडली.
डॉ.क्षितीज कुलकर्णी यांनी स्त्री लेखिकांनी पटकथा लेखनाकडे वळावे हा मौलिक विचार मांडून स्त्रिया कथालेखनात कुठेही कमी नाहीत, उलट त्या जास्त ताकदीने लिहू शकतात असा आशावाद व्यक्त केला.
अध्यक्षा मा. माधवी घारपुरे यांनी मानसी, मंगल, अस्मिता, प्रतिभा, अश्विनी, वर्षा व अलका या सात लेखिकांच्या नावांचे अर्थ स्पष्ट करत कथालेखन करताना कोणकोणत्या गोष्टींची कशी काळजी घ्यावी हे आपल्या गोड शब्दांत मांडले.
डॉ.सिसिलिया कार्व्हालो यांनी स्त्रीवादी लिखाणाचं महत्त्व अधोरेखित करताना मानव निर्मित इमारती पेक्षा निसर्गनिर्मित किंवा देवाने निर्माण केलेल्या माणसांवर प्रेम करा, जीवनातले सात सूर कसे एकत्र आल्यानंतर संगीत निर्माण होतं तसं सात लेखिकांनी काढलेला संग्रह अनेकांच्या जीवनाचं दर्शन घडविणारा कसा आहे हे सांगितले. साहित्य क्षेत्रात या सप्त तारकांच्या प्रेरणेने शत तारका लेखिका तयार होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे निवेदन मंगल कातकर व वर्षा फाटक यांनी केले, तर आभार प्रदर्शन अश्विनी चौधरी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता वर्षा जोशी याच्या गोड आवाजात सादर केलेल्या पसायदानाने झाली.
सौ.मानसी जोशी

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + 1 =