You are currently viewing आपण बिहारचे की महाराष्ट्रातील ?

आपण बिहारचे की महाराष्ट्रातील ?

पत्रकारावरील हल्ल्याचा तीव्र निषेध

सिंधुदुर्ग
पत्रकार ज्ञानेश्‍वर पाबळे यांच्यावर हल्ला करणार्‍या वाळू माफियांना त्वरीत अटक करावी
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रमुख एस.एम.देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.या घटनेचा अध्यक्ष गजानन नाईक यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
धुळे- एखाद्या चित्रपटात शोभून दिसेल अशी घटना काल जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे घडली असून 15 ते 20 वाळू माफियांनी ज्ञानेश्‍वर पाबळे या पत्रकारावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला करून जबर जखमी केले. या घटनेचा व्हीडीओ पाहिल्यावर आपण महाराष्ट्रात आहोत की बिहारमध्ये असा प्रश्‍न उपस्थित होत असून अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू माफियांवर त्वरीत कारवाई करावी व या घटनेची चौकशी करावी, हल्लेखोरांना त्वरीत अटक करावी अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रमुख एस. एम. देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
या घटनेचा अध्यक्ष गजानन नाईक यांनीही तीव्र निषेध केला आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात एस.एम. देशमुख यांनी म्हटले आहे की, वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या विरोधात बातम्या देतो, त्यातून वाळू माफियांचे हितसंबंध दुखावतात, मग ते एकत्र येतात आणि 18 ते 20 जणांची ही टोळी सकाळी-सकाळी पत्रकाराच्या कार्यालयावर हल्ला करते, जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील. या घटनेचे जे व्हीडीओ समोर आले आहेत ते आपण महाराष्ट्रात आहोत की बिहारमध्ये असा प्रश्‍न उपस्थित करणारे आहेत.
वाळू माफियांच्या गुंडगिरीचा निषेध करीत महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रमुख एस.एम. देशमुख यांनी आपले निवेदनात पुढे म्हटले आहे की, मराठवाड्यात गावागावात वाळू माफियांनी धुडगूस घातला असून नद्यांचा मोठ्या प्रमाणात उपसा सुरू आहे. तालुका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन वाळू माफियांना पाठीशी घालत असल्याने वाळू माफियांची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पत्रकारांनी त्याविरोधात आवाज उठविला तर त्यांच्यावर सामुहिक हल्ले केले जात आहेत. असे निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − 2 =