You are currently viewing कालव्याच्या दुरुस्तीसाठी ३१ ला पाण्यात बसून उपोषणाचा करणार – भानुदास दळवी 

कालव्याच्या दुरुस्तीसाठी ३१ ला पाण्यात बसून उपोषणाचा करणार – भानुदास दळवी 

तिलारी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला इशारा…

दोडामार्ग

बांदयावरून वेंगुर्ला येथे जाणाऱ्या तिलारी कालव्याची आठ दिवसात दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा ३१ तारखेला पाण्यात उपोषण करू, असा इशारा बांदा-सटमटवाडी येथील भानुदास दळवी यांनी दिला आहे. कालव्याच्या कामाला साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. याला पंधरा वर्षे झाली आहे. मात्र अद्यापपर्यंत हा कालवा सुरू झालेला नाही. काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे वारंवार समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × four =