You are currently viewing आचिर्णे येथे मधमाशांच्या हल्ल्यात पाच जण जखमी

आचिर्णे येथे मधमाशांच्या हल्ल्यात पाच जण जखमी

वैभववाडी

आचिर्णे येथील देवराईत पाच जणांवर मधमाशाने अचानक हल्ला केला. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी १०.३० वा.सुमारास घडली.आचिर्णे येथील बंडू बयाजी बुराण वय ८५, सुहास ज्योती बुराण वय ६५ , बाळकृष्ण बुधाजी गुरव वय ६०, नंदकुमार दत्ताराम गुरव वय ३५, अशोक दिनकर गुरव वय ३२ रा. सर्व आचिर्णे, हे गावापासून काही अंतरावर असलेल्या देवालयात गेले होते. दरम्यान अचानक मधमाशाच्या पोळ्यातून मधमाशा उठल्या. त्यांनी या पाच जणांवर हल्ला केला. मधमाशाच्या तावडीतून कशीबशी सुटका करीत ते गावात आले. मधमाशाने ग्रामस्थांवर हल्ला केल्याची माहीती मिळताच गावचे सरपंच रुपेश रावराणे, माजी सरपंच जयसिंग रावराणे, भाई रावराणे, राजेंद्र रावराणे, नारायण धुळप यांनी जखमींना मदत करीत तातडीने खाजगी वाहानातून वैभववाडी ग्रामीण रुण्णालयात दाखल केले. याठिकाणी डाॕ.सयाजी धर्मे यांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु केले. उपचारानतर सर्वांची प्रकृती स्थीर असल्याची माहीती डाॕ. धर्मे यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा