You are currently viewing तारकर्ली गावात कचर्‍याचे साम्राज्य…..!

तारकर्ली गावात कचर्‍याचे साम्राज्य…..!

मनसे शिष्टमंडळाने वेधले पं.स.बीडीओंचे लक्ष..!!

मालव

तारकर्ली मध्ये जागोजागी कचर्‍याचे साम्राज्य पसरले असून कचऱ्याच्या ढीग, उग्र वास,कचरा रस्त्यावर येण्याचे प्रमाण वाढले आहे. तरी कचऱ्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावण्यात यावी या मागणीसाठी मनसेचे तारकर्ली विभाग अध्यक्ष बजरंग कुबल यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मालवण पं.स.गटविकास अधिकारी जे.पी.जाधव यांची भेट घेत निवेदन सादर केले या निवेदनात असे म्हटले आहे कि
तारकर्ली गावात अनेक दिवसापासून कचऱ्याच्याचे प्रमाण खूपच वाढत आहे त्यातून निर्माण होणारा उग्रवास जनतेच्या आरोग्यास हानिकारक आहे.कचरा रस्त्यावर येण्याचे प्रमाण व वाहतूकीसाठी निर्माण होणारी अडचण अतिशय त्रासदायक आहे.याबाबत तारकर्ली-काळेथर ग्रामपंचायतीचे वेळोवेळी आम्ही लक्ष वेधले आहे. आपला जिल्हा व आपला तारकर्ली गाव प्रामुख्याने पर्यटन क्षेत्र म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो त्यातच मिशन बिगीन अंतर्गत सर्व खुले केल्यामुळे पर्यटकांची वर्दळ वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे गावातील पर्यटन व्यवसाय टिकवण्यासाठी व इतर गोष्टीं सोबतच स्वच्छता ही खूपच महत्त्वाची आहे तरी सौंदर्यपूर्ण असलेल्या तारकर्ली गावचे आरोग्य अशा कचर्‍याच्या ढिगार्‍यामुळे धोक्यात येऊ शकते.
तारकर्ली-काळेथर ग्रामपंचायतीकडे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे व्यवस्थापन नाही. या कचऱ्याच्या ढिगाऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक आहे आपण स्वतः लक्ष घालुन योग्य ती कारवाई करावी व कचरा व्यवस्थापन नियोजन अधिक प्रभावीपणे करावे.
यावेळी विभाग अध्यक्ष देवबाग बजरंग कुबल, शाखाध्यक्ष प्रसाद बापर्डेकर, मनविसे विभाग अध्यक्ष प्रतिक कुबल, मनमोहन केळुसकर, विनीत कांदळगांवकर, दत्तराज चव्हाण, आशिष घाडीगांवकर, साईराज चव्हाण, राजदीप आरोंदेकर, कौशल जोशी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − 13 =