You are currently viewing शेतकर्‍यांना दिलासा मिळण्यासाठी काजूला हमीभाव द्या…

शेतकर्‍यांना दिलासा मिळण्यासाठी काजूला हमीभाव द्या…

अजित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे मागणी; अर्चना घारेंच्या पाठपुराव्याला यश…

सावंतवाडी

कोकणातल्या काजूला हमीभाव देण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे यांनी श्री. पवार यांची भेट घेवून लक्ष वेधले होते. त्यानंतर याबाबतची मागणी करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन सौ. घारे यांनी प्रसिध्दीस दिले आहे. यात असे म्हटले आहे की, काजू-बी ला हमीभाव मिळालेला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे येणार्‍या काळात याबाबत योग्य ते धोरण शासनाकडून जाहीर करण्यात यावे तसेच कोकणातील शेतकर्‍यांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी पवार यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा