You are currently viewing निष्ठावंत आमदार वैभव नाईक वाढदिवस अभिष्टचिंतन

निष्ठावंत आमदार वैभव नाईक वाढदिवस अभिष्टचिंतन

*निष्ठावंत आमदार वैभव नाईक वाढदिवस अभिष्टचिंतन*

कुडाळ मालवण मतदारसंघाचे आम.वैभव नाईक म्हणजे सर्वसामान्यांचे प्रतिनिधी. जनतेच्या हितासाठी अगदी रस्त्यावर उतरून देखील लढा देणारे नेतृत्व.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद लाभलेले वैभव नाईक यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना निवडणुकीच्या रिंगणात शिकस्त दिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जॉईंट किलर म्हणून ते ओळखले जाऊ लागले.
उद्धव ठाकरे शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धडाकेबाज युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
त्यांच्या अविश्वसनीय कामगिरीमुळे उद्धव ठाकरेंचा देखील त्यांच्यावर वरदहस्त आहे. विधानसभेच्या सभागृहात अभ्यासपूर्ण मुद्दे मांडत आपल्या मागण्या मान्य करून घेण्यात ते माहीर आहेत.
कोरोना, पुर वा कोणतेही संकट असो जनतेच्या कल्याणासाठी ते गावोगावी फिरून लोकांची कामे करत असतात. लोकांच्या अडीअडचणी सोडवत असतात त्यामुळे ते जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.
गेली कित्येकवर्षं प्रतीक्षेत असलेला कुडाळ बसस्थानक एका वर्षात पूर्ण, मालवण कुडाळ राज्यमार्ग, असे अनेक रस्ते आदी विकास कामे पूर्णत्वास नेत त्यांनी आपल्या कामाची पोचपावती दिली आहे. राजकारणात असताना वेळात वेळ काढून स्थानिक युवकांच्या क्रिकेट सामान्यांची उद्धघाटन असो वा त्यांच्यात क्रिकेटर म्हणून समरस होणे असो, ते युवकांमध्ये मिळून मिसळून आपल्यातील आमदाराला दूर ठेवतात.
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या तत्वाने चालणारे आमदार वैभव नाईक कोणत्याही पदाची अपेक्षा न करता जनतेसाठी दिवसरात्र काम करण्यातच धन्यता मानतात.
शिवसेना औषधालाही शिल्लक ठेवणार नाही म्हणणाऱ्यांना स्वतःचं अस्तित्व टिकविण्यासाठी औषध शोधायला लावणारा पठ्ठा म्हणजे आमदार वैभव नाईक…!
शेतकऱ्यांसाठी, पारंपरिक मच्छिमारांसाठी विविध योजना आणत नेहमीच त्यांच्या संकटात धावून जाणारा संकटमोचक म्हणून आमदार वैभव नाईक यांची ओळख आहे.
आपल्या दमदार नेतृवाने मतदारसंघात विविध विकासकामे करत आपला आमदार कसा असावा हे त्यांनी लोकांना दाखवून दिले. कोकणातील कोणत्याही प्रश्नांसाठी ते कोणाही मंत्र्यांना बेधडक जाऊन भेटतात आणि आपला प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करतात. केंद्र सरकारच्या विरोधात मोर्चा असो वा आंदोलन वैभव नाईक कधीच मागे राहत नाहीत, ढाण्या वाघासारखे ते त्याचे नेतृत्व करतात. सत्ताधाऱ्यांनी अनेक चौकश्यांचा ससेमिरा मागे लावला तरी ज्या उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात त्यांना ओळख दिली, घरातील सदस्या सारखी वागणूक दिली…त्या ठाकरेंशी एकनिष्ठ राहत सत्ताधाऱ्यांच्या चौकश्यांना भीक न घालता जनतेच्या मनावर राज्य करत आम.वैभव नाईक यांनी आदर्श घालून दिला आहे. पक्ष सोडून आपल्यासोबत येण्यासाठी त्यांना गळ घालण्यात आली परंतु ते मात्र त्यांना धजले नाहीत तर आपल्या मतांवर ठाम राहिले.
सर्वसामान्य जनतेसाठी जनतेत मिसळून लढणारा कोकणचा खराखुरा उध्दव ठाकरे शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणजे आमदार वैभव विजय नाईक….!
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे युवा नेतृत्व कोकणचा ढाण्या वाघ आमदार वैभव नाईक यांचा आज वाढदिवस….
संवाद मिडियाकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि भावी राजकीय वाटचाल यशस्वी होवो या सदिच्छा..

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + twelve =