You are currently viewing नेमळेत प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत नुकसानीची अधिकाऱ्यांकडून पाहणी

नेमळेत प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत नुकसानीची अधिकाऱ्यांकडून पाहणी

हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने आता शेतकऱ्यांची विमा कंपनीवर मदार

सावंतवाडी

प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत नोंदणी केलेल्या व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नेमळे गावातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानी बाबतचा अहवाल कंपनीला सादर केला. त्यामुळे अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला असताना आता प्रधानमंत्री पिक विमा योजनेतून तरी दिलासा मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

भात कापणीला आलेले असताना

गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भातपिकाचे नेमळे गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेआहे. ऐन भरात आलेली उभी भात शेती पावसामुळे आडवी होऊन लोंब्याना कोंब यायला सुरुवात झाली आहे. तर काही ठीकाणी भात पाण्यात बुडाल्याने कुजलेल्या अवस्थेत दिसत आहेत.

या पार्श्वभूमीवर नेमळे गावातील काही शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विम्यामध्ये सहभागी होऊन पिक विमा भरला होता. परतीच्या पावसामुळे नेमळे गावातील शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रार केल्याने विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नेमळे गावात येऊन विमा भरलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भातपिकाची पाहणी करुन नुकसानीचा अहवाल विमा कंपनीकडे पाठवून देण्यात आला. यावेळी नेमळे गावातील नुकसानग्रस्त विमाधारक शेतकरी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा