You are currently viewing पीएम किसन ई-केवायसी साठी ७ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ – अजय पाटणे 

पीएम किसन ई-केवायसी साठी ७ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ – अजय पाटणे 

वाढीव मुदतीत ई- केवायसी न केल्यास लाभ मिळणार नाही…

मालवण

पीएम किसान लाभार्थ्यांनी ई केवायसी न केल्यास पुढचा लाभ मिळणार नाही. तरी या योजनेतील लाभार्थ्यांनी ई केवायसी प्रमाणीकरण तत्काळ करून घ्यावे. ई केवायसी करण्याची ३१ ऑगस्ट ही अंतिम मुदत वाढवून ७ सप्टेंबर पर्यत वाढीव मुदत शासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

केवायसी करायला मोबाईल वरून तसेच महा ई सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र, ग्रामपंचायत मध्ये सुविधा उपलब्ध आहे. ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ई केवायसी केले नाही. त्यांनी तसेच दुर्गम भागातील शेतकऱ्यांपर्यंतही याबाबत माहिती पोहोचवून पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी उद्युक्त करावे. असे आवाहन तहसीलदार अजय पाटणे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 1 =