You are currently viewing चिपी विमानतळावरून 18 ऑगस्टपासून आणखी एका विमानाचे उड्डाण

चिपी विमानतळावरून 18 ऑगस्टपासून आणखी एका विमानाचे उड्डाण

गणपती काळासाठी स्पेशल फ्लाईट सोडण्यात येणार; नितेश राणे यांची माहिती

 

कणकवली :

 

चिपी विमानतळावरून सध्या सुटत असलेल्या विमानासोबतच 18 ऑगस्टपासून आणखी एका विमानाचे उड्डाण होणार आहे. पर्यटनाच्या माध्यमातून जिल्हा विकासाला चालना देण्यासाठी येथून अजून विमान जाण्याची मागणी आपण केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे काही महिन्यांपूर्वी केली होती. त्या मागणीला यश आले असून चाकरमान्यांसाठीही आनंदाची बातमी असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

कणकवली येथे पत्रकार परिषदेत बोलताना नितेश राणे म्हणाले, चिपी विमानतळावरून 70 आसनी विमान जात होते. परंतु खऱ्या अर्थाने पर्यटन वाढवायचे असेल तर अजून एखादे तरी फ्लाईट सुरू व्हावे, अशी विनंती आपण केंद्रीय मंत्र्यांना केलेली होती. त्यानुसार आता गणपती काळासाठी हे स्पेशल फ्लाईट सोडण्यात येणार आहे. 18 ऑगस्टपासून हे फ्लाईट सुरू होईल. सध्या नियमित सुटणारे विमान सकाळी 11:30 वाजता मुंबईहून उडते व 12.50 वाजता चीपीला पोहोचते तर दुपारी 1.30 वाजता मुंबईकडे जाण्यासाठी उडते व 3 वाजता मुंबईला पोहोचते.

18 ऑगस्ट पासून सोडण्यात येणारे विमान हे दुपारी 3 वाजता मुंबईहून सुटणार असून 4.20 ला चिपिला पोहोचणार आहे. तर 4.45 वाजता मुंबईच्या दिशेने झेप घेणार असून सायंकाळी सहा वाजता मुंबईला पोहोचणार आहे. जिल्ह्यात येणारे चाकरमानी व नागरिकांची गैरसोय बऱ्यापैकी दूर होणार आहे. आपण केलेल्या मागणीनुसार केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे, एअर अलायन्सचे प्रमुख तसेच श्री. वीरेंद्र म्हैसकर, अदानी एअरपोर्ट व इतरांनी यासाठी जे सहकार्य केले, त्या सर्वांचे आपण आभार मानतो. सध्याच्या 70 सीटच्या बरोबर ने आणखी 70 सीट या विमानाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे सकाळी कामासाठी आलेला माणूस सायंकाळपर्यंत परत जाऊ शकतो. पर्यटनासोबतच चाकरमान्यांसाठी हे सोयीचे होणार आहे. त्यासाठी आपण केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे श्री. राणे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × two =