You are currently viewing आशा सेविकांना वेठबिगाराची वागणूक नको. . .
आमदार नितेश राणे यांनचे आरोग्यमंत्र्यांना पत्र

आशा सेविकांना वेठबिगाराची वागणूक नको. . .

आशा सेविकांना वेठबिगाराची वागणूक नको,वाढीव भत्त्यासह मानधन द्या…

आमदार नितेश राणे यांनचे आरोग्यमंत्र्यांना पत्र,

आशा सेविकांना आरोग्य सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याचीही केली मागणी.

गणेशोत्सव काहीच दिवसांवर आला आहे, असे असतांना आशा सेविकांना त्यांच्या हक्काचे मानधन मिळालेले नाही. त्यांचे मानधन वाढीव भत्त्यासह त्वरीत देण्याची कार्यवाही व्हावी. तसेच आशासेविकांना कायमस्वरूपी आरोग्य सेवेमध्ये सामावून घेण्याबाबत त्वरीत शासन निर्णय व्हावा अशी मागणी कणकवली-देवगड-वैभववाडी मतदार संघाचे भाजपा आमदार नितेश राणे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

आमदार नितेश राणे यांनी आशा सेविकांच्या प्रश्नासंदर्भात आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहेकी, कोरोना साथीच्या आजारामध्ये शासन व आरोग्य यंत्रणा विविध उपाययोजना राबवित असताना, शासनाच्या योजना व मार्गदर्शक सूचनांची तळागाळापर्यंत अंमलबजावणी करण्यासाठी जी कर्मचारी व अधिकारी मंडळी कार्यरत आहेत, त्यांना बहुमोलाचे सहकार्य करण्याचे काम गावपातळीवरील आशा सेविका करीत आहेत. कोरोना साथीच्या पूर्वीपासून सुद्धा या आशासेविका ग्रामपातळीवर त्वरीत आरोग्य सेवा देण्यासाठी तत्परपणे कार्यरत असतात. गावातील वाडीवस्तींमध्ये विखुरलेल्या दुर्गम ग्रामीण भागात जिथे रस्त्याअभावी पुरूष मंडळींना फिरणे कठीण असते अशा ठिकाणी जनतेचे आरोग्य सुरक्षित रहावे यासाठी पायपीट करून राबणाऱ्या या आशा सेविकांना अत्यंत तोकडे मानधन ते पण अनियमितपणे देऊन शासन त्यांना वेठबिगाराची वागणूक देत आहे.
आशा सेविकांच्या विविध मागण्या त्यांच्या संघटनांनी यापूर्वी अनेकवेळा मांडल्या आहेत. परंतु त्यावर शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही त्या मागण्यांवर त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी पत्राव्दारे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + 14 =