You are currently viewing तरूणांनो उद्योजक व्हा, रोजगार निर्माण करा

तरूणांनो उद्योजक व्हा, रोजगार निर्माण करा

तरूणांनो उद्योजक व्हा, रोजगार निर्माण करा

: ना. नारायण राणे यांची कोकणातील तरुणांना साद

तरूणांनो उद्योजक व्हा, रोजगार निर्माण करा. उत्पन्नात भर टाका, स्वत:चे, देशाचे उत्पन्न वाढवुन आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी प्रयत्न करूया .

कोकणातील सर्व वडिलधारी मंडळी व तरूण मित्र हो !

नमस्कार,
आज मी तुमच्याशी या पत्राद्वारे राजकारण सोडून बोलण्याचे ठरविले आहे. मला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब तसेच गृहमंत्री अमितजी शहा, महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यामुळे केंद्रात कॅबिनेट मंत्री पद मिळाले. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग हा विभाग मला दिलेला आहे. या निर्णयाचा आनंद कोकणातील लोकांना किती झाला यावर मी भाष्य करणार नाही. मला आनंद झाला तो यासाठी की कोकणातील माणसांची आर्थिक प्रगती किंवा उद्योग रोजगाराच्या माध्यमातून प्रगती करण्याची ही मला संधी मिळाली आणि त्यामुळे या विभागातर्फे मी कोकणातील तरूणांना, उद्योजकांना योग्यते मार्गदर्शन मिळावे, प्रेरणा मिळावी, उद्योग उभारायला आर्थिक मदत व्हावी, वेगवेगळया टेक्नॉलॉजीची त्यांना ओळख व्हावी आणि त्यातून वेगवेगळी उत्पादने काढून आर्थिक प्रगती साध्य करता येईल यासाठी सर्वते प्रबोधन आमच्या विभागातर्फे मिळणार आहेत यासाठी कोकणातील सर्व जिल्ह्यांत ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या सेंटरमधून वेगवेगळे प्रकारचे मार्गदर्शन करणारे वेगवेगळी कार्यालये खुली होतील यामाध्यमातून उद्योग करू इच्छिणाऱ्यांना, बेकारांना रोजगार मिळेल. मोठ्याप्रमाणात महिलांच्या दोन हातांना काम मिळवून त्या कुटुंबाला हातभार लावू शकतील. थोडक्यात महिलांचे सबलीकरण यातून होईल या उद्देशाने मी प्रयत्न करीत आहे.
फेब्रुवारी २४, २५ आणि २६ या तीन दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध योजनांची ओळख, विविध मशनिरींची ओळख, उद्योग किंवा व्यवसाय करण्याचे स्कील (कौशल्य) यांच्या मार्गदर्शनातून असंख्य उद्योग जिल्ह्यात सुरू व्हावेत. जिल्ह्यातील साधनसामुग्रीच्या सहाय्याने उत्पादने काढणारे उद्योग तयार व्हावेत हा प्रयत्न आहे. २५ तारीखला या मशनिरीज पहावयास ठेवण्यात आल्या आहेत.
सिंधुदुर्गातील तरूणांनो, उद्योजकांनो आता तुम्हाला हताश व्हायची गरज नाही. आर्थिक चिंतेत राहायची गरज नाही. उद्योजकांना काही करून दाखवायचे आहे, नव उद्योजकांना संधी हवी आहे तर एकच उत्तर आहे MSME हा केंद्रसरकारचा विभाग !
सूक्ष्म विभागातील उद्योगांसाठी १ कोटीची मर्यादा आहे.
लघु विभागातील उद्योगांमध्ये ५० कोटी ची मर्यादा आहे.
मध्यम विभागातील उद्योगांसाठी २५० कोटीची मर्यादा आहे. आणि त्यावर सबसिडीही मोठ्याप्रमाणात आहे.
तेव्हा सर्वांना सांगायचे आहे हा राजकारणाचा भाग नाही. तुमच्या आर्थिक प्रगतीचा हा एक भाग आहे. तेव्हा २५ व २६ ला होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित रहा. ज्या उद्योगात तुम्हाला रस आहे, आवड आहे, शिक्षण आहे त्याबद्दल ची माहिती आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून उपलब्ध करून घ्यावी यासाठी हा कार्यक्रम आहे.
शरद कृषी भवन ओरोस आणि कणकवली येथील प्रहार भवनमधील ‘क्वॉयर बोर्ड’ च्या कार्यालयाला भेट द्या. उद्योगांसाठी चे ज्ञान आत्मसात करा, स्वाभिमानाने तुमच्या पायावर सक्षमपणे उभे रहा. या स्तुत्य हेतूने मला मिळालेल्या खात्याचा लाभ तुम्हाला मिळवुन देण्यासाठी उपक्रम आहे.
धन्यवाद !

ना. नारायण राणे

केंद्रिय मंत्री भारत सरकार

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 − one =