You are currently viewing १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील सर्व विद्यापीठे, संलग्न कॉलेज बंद

१५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील सर्व विद्यापीठे, संलग्न कॉलेज बंद

वाढत्या करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

मुंबई :

राज्यातील सर्व अकृषी, अभिमत, स्वायत्त विद्यापीठे, तंत्रनिकेतन आणि संलग्न महाविद्यालयांचे वर्ग १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. या काळात शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू राहणार आहेत. तसेच या सर्व विद्यापीठांच्या आणि संलग्न महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालयांसंदर्भात सर्व विभागीयआयुक्त, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व कुलगुरू यांच्या समवेत बुधवारी झालेल्या बैठकीत चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी हि माहिती दिली.

१३ ऑक्टोबर २०२१ रोजी राज्य सरकारने महाविद्यालये ऑफलाइन सुरू करण्याच निर्णय घेतला. दोन लस घेतलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजला येण्याची परवानगी दिली. परंतु गेल्या काही दिवसांपासून करोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होतो आहे. त्यामुळे हे निर्णय घेण्यात आल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा