You are currently viewing कणकवली शहरात 20 ते 27 सप्टेंबर जनता कर्फ्यू: नगराध्यक्ष समीर नलावडे

कणकवली शहरात 20 ते 27 सप्टेंबर जनता कर्फ्यू: नगराध्यक्ष समीर नलावडे

कणकवली:
कणकवली शहरातील जनतेच्या मागणीनुसार तसेच व्यापारी, विविध संघटना यांच्या पाठिंब्यामुळे कणकवली शहर दिनांक 20/9/2020 ते 27/9/2020 पर्यंत
जनता कर्फ्यू केला आहे.  आपल्या सर्वांच्या सहकार्याने आज चार दिवस झाले. जनतेने, व्यापाऱ्यांनी, व तुम्ही, जनता कर्फ्यू ची उत्तम रीत्या अमलबजावणी केलीत या बद्दल तुमचा मी आभारी आहे.
मी नगराध्यक्ष तथा covid-19 समिती अध्यक्ष या नात्याने सूचना करतो की आपण आपल्या प्रभागात जाऊन लोकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होत असेल तर त्या गैरसोयीचं निवारण केलं पाहिजे. तसेच जीवणावक्षक वस्तूंची, वैद्यकीय सेवा, आणि मुलभूत सेवा यांची माहिती घेऊन त्या पूर्ण केल्या पाहिजेत अशी व्यवस्था केली पाहिजे.
नगरसेवक म्हणजेच लोकसेवक या धारणेतून आपण आपलं कर्तव्य पार पाडले पाहिजे.
मी ही माझ्या कर्तव्याची जाण ठेवून उद्या दिनांक
23 सप्टेंबरला नियमाचे पालन करून कणकवली शहराचा आढावा घेणार आहे. तुम्हीसुद्धा नियमाचे पालन करून आपापल्या प्रभागांमध्ये जाऊन आपली जबाबदारी पार पाडावी असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × five =