You are currently viewing राष्ट्रवादीच्या कार्यालयातून जनतेचे प्रश्न सोडविले जावेत : प्रदेशाध्यक्ष,मंत्री जयंत पाटील

राष्ट्रवादीच्या कार्यालयातून जनतेचे प्रश्न सोडविले जावेत : प्रदेशाध्यक्ष,मंत्री जयंत पाटील

कणकवलीत झाले कार्यालयाचे उदघाटन

राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, आणि निखिल गोवेकर यांच्या कामाचे मंत्री पाटील यांनी केले कौतुक

कणकवली
कणकवलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय होते याचा आनंद आहे.या कार्यालयातून जनतेचे प्रश्न जाणून घेतले जातील आणि ते सोडविले जातील असे काम करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष,आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, आणि कणकवली शहरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी निखिल गोवेकर यांच्या कामाचे मंत्री जयंत पाटील यांनी कौतुक केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष,जयंत पाटील यांचे कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष अंनत पिळणकर जिल्हा बँक संचालक आर.टी. मर्गज यांनी स्वागत केले.यावेळी कणकवलीत राष्ट्रवादी कार्यालयाचे उदघाटन मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आ.शेखर निकम,माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले,जिल्हाध्यक्ष अमित सामंत,राष्ट्रवादी युवती महाराष्ट्र अध्यक्ष सक्षणा सलगर हे प्रमुख नेते उपस्थित होते.

यावेळी काका कुडाळकर,सागर वारंग,रुपेश जाधव, निखिल गोवेकर,विनोद मर्गज, अभिनंदन मालंडकर,संदेश मयेकर,समीर आचरेकर,राजेश पाताडे,देवेंद्र जाधव,आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 2 =