You are currently viewing नांदरुख-नाईकवाडीत तुटून पडलेल्या विद्युतभारीत तारेचा स्पर्श होऊन बैलाचा मृत्यू…

नांदरुख-नाईकवाडीत तुटून पडलेल्या विद्युतभारीत तारेचा स्पर्श होऊन बैलाचा मृत्यू…

मालवण

तालुक्यातील नांदरुख -नाईकवाडी येथे रानात चारण्यासाठी सोडलेल्या बैलाचा तुटून पडलेल्या विद्युत भरीत तारेला स्पर्श होऊन मृत्यू झाला. दरम्यान बैलाला वाचविण्यासाठी गेलेले शेतकरी विजय आणि त्यांची पत्नी यानाही काहीसा विजेचा धक्का बसला.
सोमवारी सकाळी नांदरुख- नाईकवाडी येथील शेतकरी विजय अनंत चव्हाण हे नेहमीप्रमाणे आपली गुरे चारण्यासाठी रानात सोडण्यास जात असताना तुटून पडलेल्या विद्युतभरीत तारेचा बैलाला स्पर्श झाल्याने बैल विजेच्या धक्क्याने शेतकरी विजय चव्हाण यांच्या समोरच जागीच मृत्यूमुखी पडला. बैलाला वाचविण्यासाठी गेलेले शेतकरी आणि त्यांची पत्नी यानाही काहीसा विजेचा धक्का बसला. या घटनेची माहिती महावितरणच्या कर्मचाऱ्यांना देऊन वीजपुरवठा बंद करण्यात आला. घटनास्थळी नांदरुख सरपंच, तलाठी यांनी पहाणी केली तर पशुवैद्यकिय अधिकारी, वीज वितरण अधिकारी, पोलिस यांनी घटनेचा ठिकाणी येऊन पंचनामा केला. शेतकरी विजय चव्हाण यांचा सुमारे ४५,००० रुपये किमतीचा बैल मृत्यूमुखी पडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × one =