You are currently viewing “दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो पण…”

“दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो पण…”

मराठा आरक्षणावरुन आंदोलन पुकारणारे भाजपा खासदार संभाजीराजेंनी पुन्हा एकदा लढा सुरु करण्याचा इशारा दिला आहे. आता पुढच मूक आंदोलन नांदेड येथे होणार असल्याचं संभाजीराजेंनी पुण्यामधील मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीमध्ये म्हटलं आहे. इतकच नाही तर संभाजीराजेंनी जुलै महिन्यात कोल्हापूरमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज यांची भेटी घेतल्यानंतर तर्कवितर्क लढवणाऱ्यांनाही आपल्या भाषणामधून चांगलाच टोला लगावला आहे. तसेच या भाषणात बोलताना त्यांनी आपण ही लढाई संयमाने लढत असल्याचं अधोरेखित केलं. दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो पण आपल्याला ते करायचं नाही, असंही संभाजीराजे म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाची भूमिका ही समांजस्याची असल्याचं संभाजीराजेंनी आपल्या भाषणात अधोरेखित केलं. यावेळी त्यांनी मतभेद विसरुन लोकं मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी एकत्र आल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो पण आपल्याला ते करायचं नाहीय, असं सांगत संभाजीराजेंनी ही लढाई संयमानेच लढली जाईल असं स्पष्ट केलं. वर्षानुवर्षे जे लोक एकमेकांची तोंडं पाहत नव्हते ते आज या बैठकीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. आपल्याला अशाच एकजुटीने लढायचं आहे आणि मराठा समाजाला न्याया मिळून द्यायाचा आहे, असं संभाजीराजेंनी या बैठकीमध्ये सांगितलं.

चहा प्यायला म्हणजे विषय संपला असे होत नाही. अजित पवार कोल्हापूरला घरी जाऊन भेटले त्यावेळी अनेकजण म्हणाले. महाराज मॅनेज झाले वगैरेही चर्चा सुरु झाल्या, पण ज्या दिवशी मॅनेज होईल त्या दिवशी घरी बसेल जाऊन छत्रपती असे नाही मॅनेज होणार माझ्यावर विश्वास ठेवा, अशा शब्दांमध्ये संभाजीराजेंनी या भेटीवरुन टीका करणाऱ्यांना सुनावलं. मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण तापलेलं असतानाच १४ जुलै रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेऊन संवाद साधला होता. करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या अजित पवारांनी सोमवारी कोल्हापुरातील नवीन राजवाडा येथे जाऊन शाहू महाराजांची भेट घेत चर्चा केली. अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यात जवळपास एक तास बैठक सुरु होती. याच बैठकीनंतर ज्या चर्चा झाल्या त्यावरुन संभाजीराजेंनी टीकाकारांना आज मराठा मोर्चाच्या बैठकीमधील भाषणातून सुनावलं.

आता जीआर काढून दाखवा…

सामाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय तुम्ही आरक्षणात काहीही करू शकणार नाही. ज्या लोकांना समाजाबद्दल काही माहिती आहे असे लोक सदस्य पाहिजेत, अशी मागणी संभाजीराजेंनी केली. माझी बाजू मांडण्याची भूमिका मी घेत आहे,आरक्षण अनेक दिवस चालेल पण आपल्या मागण्याच काय?, असा प्रश्न संभाजीराजेंनी उपस्थित केला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्र्यांसोबत २२ मागण्यांसाठी बैठक झाली,मात्र अजून यात काहीच केलं नाही,आता सरकारने वसतिगृह बाबत जीआर काढून दाखवावा,आता दोन महिने झालेत, असंही संभाजीराजे म्हणाले.

नांदेडमध्ये मूक मोर्चा…

आता काय करायचं? तुम्ही सांगा काय करायचं? दोन मूक आंदोलनं झाली तरी राजे शांत. महापूर आला म्हणून आम्ही थांबलो. दोन महिने झाले कोव्हिड परस्थिती सुधारते. पण तुम्ही मराठा समाजाचे एवढे आंदोलन झालं. त्यासाठी अजून एक आंदोलन करावे लागणार. आता नांदेडला एक मूक आंदोलन करू, असंही संभाजीराजे म्हणालेत. २० ऑगस्ट रोजी नांदेड येथे मूक आंदोलन होणार होणार असल्याची घोषणा या कार्यक्रमामध्ये मराठा क्रांती मूक मोर्चा समन्वयकांनी केलीय.

आझाद मैदानावर उपोषणाची तयारी…

तसेच मी सुद्धा आता तेच तेच बोलून थकलोय अशा शब्दात त्यांनी आपली या मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन होत असलेल्या विलंबाबद्दलची नाराजी व्यक्त केलीय. मात्र त्याचवेळेस त्यांनी मराठा आरक्षणासाठी आता थेट मुंबईतील आझार मैदानावर लाक्षणिक किंवा बेमुदत उपोषण करण्याची घोषणा संभाजीराजेंनी केलीय.”माझी एकट्याची आझाद मैदानावर लाक्षणिक किंवा बेमुदत उपोषणास करण्याची माझी तयारी आहे. तुम्हीच ठरवा आणि सांगा,” असं संभाजीराजेंनी या बैठकीमध्ये सहभागी झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना आणि कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळ बाबत काहीच नाही केलं मग हे किती दिवस झालं असं चालणार,ओबीसींना शिक्षणात दिल्या जाणाऱ्या सवलती तरी जाहीर काही तरी करा. अशी मागणी संभाजीराजेंनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + 6 =