You are currently viewing ‘यास’ चक्रीवादळ तौक्तेपेक्षाही भयंकर;  महाराष्ट्राला काय धोका?

‘यास’ चक्रीवादळ तौक्तेपेक्षाही भयंकर; महाराष्ट्राला काय धोका?

सध्या Tauktae चक्रीवादळाच्या विध्वंसातून देश सावरलेला नसताना आता आणखी एक भयानक चक्रीवादळ Yaas येत आहे. त्याची वाटचाल सुरु झाली आहे. ते पश्चिम बंगालच्या दिशेने येणार आहे. हे यास चक्रीवादळ भयंकर असणार आहे, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. भारताच्या पश्चिम भागात Tauktae वादळाने जोरदार तडाखा दिला. होत्याचे नव्हते केले. आता पूर्व भागात यासचा धोका वाढत आहे. हे  वादळ 26 मे रोजी ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, धोका लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने 25 गाड्या रद्द केल्या आहेत.

बंगालच्या उपसागराच्या मध्य पूर्व भागात कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. हे वादळ आज 24 मे पर्यंत रूप धारण करील. यास हे चक्रीवादळ उत्तर, वायव्य दिशेने जाईल आणि 26 मे पर्यंत चक्रीवादळाच्या वादळात बदलू शकेल. पुढील 24 तासांत, हे वादळ चक्रीवादळाचे रुप घेईल. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार बंगाल आणि ओडिशा येथे 26 मेपर्यंत मुसळधार पाऊस पडेल.

चक्रीवादळ यासचा धोका लक्षात घेता भारतीय रेल्वेने 24 मे ते 29 मे दरम्यान 25 गाड्या रद्द केल्या आहेत. रद्द केलेल्या सर्व 25 गाड्यांची यादी रेल्वे प्रेस  नोट जारी करुन ही माहिती दिली आहे.

भारतीय नौदलाची कंबर कसली

यास चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी भारतीय नौदलही पुढे आले आहे. पूर्वेकडील किनाऱ्यावर नौदलाने चार जहाजे व विमान तैनात करुन ठेवली आहेत. या व्यतिरिक्त बचाव पथक तसेच वैद्यकीय पथकालाही तयार राहण्यास सांगितले आहे. विशाखापट्टणममधील आयएनएस डागा आणि चेन्नईतील आयएनएस रजालीही कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + 2 =