You are currently viewing ‘काउंटडाऊन सुरु झालाय; उद्धव ठाकरेंना 40 दिवसांमध्ये मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल’

‘काउंटडाऊन सुरु झालाय; उद्धव ठाकरेंना 40 दिवसांमध्ये मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल’

नाशिक

उद्धव ठाकरे यांना साधू हत्येचं पातक फेडावं लागेल. अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना साधुंचे तळतळाट भोवले. आता येत्या 40 दिवसांत त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागेल, असे वक्तव्य आचार्य तुषार भोसले यांनी केले आहे. (Tushar Bhosale take a dig at CM Uddhav Thackeray)

ते मंगळवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर आगपाखड केली. अनिल देशमुख यांना साधू हत्येचा तळतळाट लागला तसेच तुम्हालाही पाप फेडावे लागणार आहे. आता पुढचा नंबर उद्धव ठाकरे यांचा आहे. ठाकरे सरकारची उलटगणती सुरु झाली आहे. 40 दिवसांच्या आत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल, असा दावा आचार्य तुषार भोसले यांनी केला.

येत्या आठ दिवसात तिसऱ्या मंत्र्याचा राजीनामा; चंद्रकांत पाटलांच्या विधानाने खळबळ

शिवसेना नेते संजय राठोड यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आणखी एक मोठं विधान केलं आहे. येत्या आठ दिवसात आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. मात्र, या मंत्र्याचं नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे ठाकरे सरकारमधील कोणता मंत्री राजीनामा देणार? याबाबतचे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 − five =