You are currently viewing त्या गद्दार नगरसेवकांच्या जाण्याने शहर स्वच्छ..

त्या गद्दार नगरसेवकांच्या जाण्याने शहर स्वच्छ..

वाभवे – वैभववाडी न. पं. निवडणुकीत भाजपा 17 पैकी 17 जागा जिंकणार – नासीर काझी.

चिखल माती तुडवत आ. नितेश राणे यांनी ज्यांना निवडून काढले, पदे दिली, तेच गद्दार निघाले.

वैभववाडी
ते सहा नगरसेवक गेल्यामुळे वैभववाडी शहर स्वच्छ झाले आहे. शहरवासीयांना अपेक्षीत होतं ते त्यांनी स्वतः केला आहे. आमदार नितेश राणे यांनी चिखल माती तुडवत त्या गद्दारांना मागील निवडणुकीत निवडून काढलं होतं. प्रचारादरम्यान आमदार स्वतः महिनाभर थांबले होते. ते गल्लोगल्ली फिरले. त्या गद्दारांना नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदे दिली. आणि सत्ता उपभोगून त्या सहा जणांनी गद्दारी केली. त्यांचा जाहीर निषेध असल्याची प्रतिक्रिया वैभववाडी भाजपा मंडळ अध्यक्ष नासीर काझी यांनी दिली आहे.
वैभववाडी भाजपाचे सहा नगरसेवक शिवबंधनात अडकत आहेत. या पार्श्वभूमीवर नासीर काझी म्हणाले, होऊ घातलेल्या वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत 17 पैकी 17 जागा भाजपाचे नगरसेवक निवडून येतील. त्यांच्या जाण्याने पार्टी शुद्ध झाली आहे. जे विरोधक नगरपंचायत, नगरसेवकावर टिका करत होते. त्याच नगरसेवकांना सेनेने प्रवेश दिला आहे. हे कोणत्या नीतिमूल्यात बसतं. असा सवाल नासीर काझी यांनी केला आहे. त्यांच्या जाण्याने कोणताही परिणाम होणार नाही. वैभववाडी न. प. ची निवडणुक शतप्रतिशत भाजपा जिंकणारच असा विश्वास काझी यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − 10 =