You are currently viewing अर्चना फाउंडेशन धावणार जगाच्या पोशिंद्याच्या मदतीसाठी

अर्चना फाउंडेशन धावणार जगाच्या पोशिंद्याच्या मदतीसाठी

सावंतवाडी :

सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील यांची २०१९ – २०२१ सालातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकरी आणि व्यापारी यांना नुकसान भरपाई मिळण्यास होणाऱ्या दिरंगाई बद्दल आज कोकण विभाग राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष अध्यक्ष सौ. अर्चना घारे-परब यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान पाटील यांच्याशी सौ.अर्चना घारे यांनी सविस्तर चर्चा केली. सरकारने शेतकरी आणि व्यापारी यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले असून देखील, नुकसान भरपाईसाठी आलेली ७५ % रक्कम दिली जात नाही. यामागचे कारण काय आहे ? तसेच यासाठी काही शासकीय कागदपत्रांची पूर्तता करायची आहे का ? या बाबत चर्चा केली.

या चर्चेमधून काही शेतकऱ्यांची KYC, SOP करण्याचे काम अपूर्ण असल्याने, ते पूर्ण झाल्यावर १५ मे पर्यंत सर्व शेतकरी आणि व्यापारी यांना नुकसान भरपाई त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल. असे तहसीलदार पाटील यांनी सांगितले. तसेच KYC करण्यासाठी काही संस्थानी प्रशासनाला मदत करावी असे आवाहन पाटील यांनी केले. त्यासाठी अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून नक्की मदत करू असा विश्वास घारे यांनी व्यक्त केला. नुकसान ग्रस्त शेतकरी आणि व्यापारी बांधवानी यासाठी संपर्क साधावा असे आवाहन सौ. अर्चना घारे-परब यांनी केले.

यावेळी त्यांच्यासोबत सायली दुभाषी, राकेश नेवगी, हिदायततुला खान, विवेक गवस, गौरांग शेरलेकर, ऋतिक परब आणि श्रीकांत कोरगावकर तसेच सावंतवाडी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा