गोंदी येथे 42 वर्षानंतर स्नेहमीलन कार्यक्रम उत्साहात सम्पन्न,
जुन्या आठवणींनी वर्गमित्र झाले भावूक, अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू.
गोंदी येथील जि. प. प्रशाळेतल्या माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या स्नेहमिलन व गुरुजनांचा आत्मीय सत्कार सोहळा गोंदी येथे आयोजित करण्यात आला .यावेळी तत्कालीन शिक्षक सुरेश गोंदीकर, श्रीकांत गोंदीकर, बाबुराव होन्ना, शरद तांबोळी,विजय पारसेवार, बाबासाहेब वाघमारे,सुरेश कुटे, सरपंच सुनीता गव्हाणे,उप सरपंच मन्सूर शेख, वर्तमान मुख्याध्यापक सर्जेराव गडदे,माजी उपसरपंच शेखर सोळुंके, सोमनाथ गव्हाणे, कचरू मरकड आणि विविध क्षेत्रात कार्यरत असलेले 225 शाळेचे माजी विद्यार्थी/विद्यार्थिनी उपस्थित होते.
या कार्यक्रमवेळी शाळेला सर्वांच्या वतीने ऑल इन वन प्रिंटर देण्यात आला.त्यामध्ये सर्वश्री सौ कविता कदम हिच्या वतीने 32 इंच टी व्ही, व DVR, सौ देवकन्या तोतला व प्रमोद तोतला यांच्यावतीने साऊंड सिस्टिम, सौ मंगल पहाडे च्या वतीने फॅन्स, बाबू चांडगे च्या वतीने भिंतीवरील घड्याळी, प्रभाकर मिरकड याने दरवर्षी दहावीच्या पहिल्या 3 विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ रोख रक्कम द्यावी त्यासाठी एक कोष तयार करावा त्या कोषात स्वतःच 25000 योगदान जाहीर केले,अशोक जैस्वाल यांनी दहा हजार देण्याचे जाहीर केले,सौ नीता कोठारी व राजेश कोठारी यांनी वृक्षारोपणासाठी झाडे व गार्डन साठी फुलझाडे देण्याचे कबूल केले. मुलींकडून सहभाग शुल्क घेण्यात आले नव्हते परंतु जवळपास 20 मुलींनी 20,000 रु शाळेसाठी योग्य ती वस्तू घेण्यासाठी दिले.
प्रास्ताविक पर बोलतांना प्रमोद तोतला यांनी स्नेहमीलणाची संकल्पना कशी सुचली हे सांगितले. तसेच सर्व मित्रांनी पाहिलेले स्वप्न आज प्रत्यक्षात सकारात्मक आहे याबद्दल आनंद व्यक्त केला. आपण ज्या शाळेत शिकलो खेळलो, बागडलो त्याच शाळेत कार्यक्रम घ्यावा हा माझा अट्टाहास होता व त्यास सर्वांनी भरभरून सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
प्रास्ताविक प्रमोद तोतला यांनी तर सूत्रसंचालन विजय जाधव, बळीराम काळे यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलन स्वागत गीत आणि दिवंगत शिक्षक व माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली.
यावेळी उपस्थित असलेल्या माजी शिक्षकांचा भेट वस्तू शाल व श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
42 वर्षांपूर्वीचा तो निरागसपणा, मधल्या सुटीतील डब्याची ओढाताण, शिक्षकांची धास्ती आणि पावसाळ्यात शाळेत केलेली मजा, अशा अनेक आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. ‘कोण काय करतेय?’ यापेक्षा ‘तू कसा आहेस?’ या प्रश्नाने सर्वांचे मन भरून आले.फौजी, डॉक्टर, इंजिनिअर, पोलीस, शिक्षक, प्राध्यापक, मोठे अधिकारी ते व्यावसायिक अशा विविध क्षेत्रांत स्थिरावलेले हे मित्र पुन्हा एकदा शाळेत एकत्र आले.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिवारिक परिचय दिला. सर्व गुरुजणांनी त्यांच्या आठवणी सर्वांसमोर सांगितल्या. कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्ट नियोजन प्रमोद तोतला व टीम च्या मेंबर्स णी केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.
गुरुजी बाबासाहेब वाघमारे यांनी सहलीतील हिस्सा सांगितला आणि लिंबोणीच्या झाडामागे, चंद्र कोपला ग बाई हे गाणे म्हटले आणि सर्व विद्यार्थी झोपी कसे गेले हा प्रसंग सांगितला.
श्री सुरेश जहागीरदार सर म्हणाले जसं स्वराज्य मिळवण्याआधी सुद्धा मावळे होतेच परंतु छ. शिवाजी महाराजांनी त्यांना गोळा करून चैतन्य भरलं तसंच प्रमोद तोतला याने मित्र परिवार गोळा करून हा कार्यक्रम घडवूनआणला.
कार्यक्रमाच्या शेवटी मनोज मरकड यांच्या वतीने आयोजित स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद तोतला,मनोज मरकड, श्रीमंत सोळुंके, कृष्णा गवळी, अशोक काळे, शिवाजी गवळी,दिलीप जगरवाल, परमेश्वर गुळवने, मनोहर पवळे, कमलाकर रामदासी,संजय सोळुंके,निलेश काला, कल्याण तोडेकर, यांनी विशेष परिश्रम घेतले.
शेवटी विद्यार्थ्यांनी गाण्यांच्या तालावर नाच गाणे करून एकमेकांचा निरोप घेतला.शेवटी
जड अंतःकारणाने सर्वांनी निरोप घेतला.
