You are currently viewing असलदेत शेतकरी मेळावा संपन्न 

असलदेत शेतकरी मेळावा संपन्न 

कणकवली :

 

असलदे ग्रामपंचांयत येथील रामेश्वर सभागृहात रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी व असलदे ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

आंबा व काजु बागायतदारांनी किफायतशीर असलेली सेंद्रीय शेती करण्याची आवश्यकता आहे. सेंद्रीय शेतीमुळे होणारा खर्च मर्यादित होवून शेतक-याच्या उत्पन्नात वाढ होते, त्यासाठी आवश्यक ते तंत्र आत्मसात केले पाहिजे. भात शेती मध्ये उत्पादित झालेला तांदुळ बाजारात उकडा तांदूळ करुन विकल्यास शेतक-यांनी चांगला नफा होईल. रासायनिक खतांचा मर्यादित वापर करुन पारंपारिक सेंद्रीय खतांचा वापर शेतक-यांनी करावा. विषमुक्त शेती करण्यासाठी शेतक-यांनी पुढाकार घेतल्यास आम्ही मार्गदर्शन करु शेतक-यांनी पारंपारिक बी –बियाण्यांची जोपासना केली पाहिजे. शेतक-यांनी नफ्यात वाढ होण्यासाठी सेंद्रीय शेतीची कास धरावी असे, आवाहन छ. शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्रा.प्रसाद ओगले यांनी केले.

यावेळी व्यासपिठावर असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, चेअरमन भगवान लोके, उपसरपंच सचिन परब, व्हाईस चेअरमन दयानंद हडकर, खरेदी विक्री संघ संचालक पंढरी वायंगणकर, माजी चेअरमन प्रकाश परब, तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे, पोलीस पाटील सावित्री पाताडे, कृषी तज्ञ प्राध्यापक प्रसाद ओगले, आत्मा व्यवस्थापक विनायक पाटील, माजी सरपंच लक्ष्मण लोके, माजी व्हाईस चेअरमन प्रदिप हरमलकर, ग्रामपंचायत सदस्य आनंद तांबे, विद्या आचरेकर, विद्या डामरे, सुवर्णा दळवी, सपना डामरे, आनंदी खरात, कृषी सहाय्यक श्री. बुदवळे, कृषी पर्यवेक्षक हुसेन आंबार्डेकर, ग्रामसेवक आर. डी. सावंत, संजय तांबे, सोसायटी संचालक शत्रुघ्न डामरे, उदय परब, विठ्ठल खरात, अनंत तांबे, परशुराम परब, सचिव अजय गोसावी, रघुनाथ लोके, संजय डगरे, महेश लोके, मनोज लोके, संदेश आचरेकर, प्रकाश आचरेकर, विनायक दळवी, सुरेश मेस्त्री, दिपक तांबे, विजय नरे, दया लोके, प्रकाश डामरे, अनिल लोके, ग्रामपंचायत कर्मचारी मधुसुदन परब , प्रकाश वाळके, सायली दळवी, सत्यवान घाडी आदींसह आरोग्य कर्मचारी, ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 6 =