You are currently viewing सिंधुदुर्गात सर्व ग्रामपंचायतीत मध्यान्ह भोजन योजना सुरू करा – प्राजक्त चव्हाण

सिंधुदुर्गात सर्व ग्रामपंचायतीत मध्यान्ह भोजन योजना सुरू करा – प्राजक्त चव्हाण

कामगार संघटनेची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी…

सिंधुदुर्गनगरी

कामगारांसाठी असलेली मध्यान्ह भोजन योजना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याकडे केली. नुकतीच चव्हाण यांनी याबाबत नायर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी शासनाकडून कामगारांसाठी दोन वेळचे जेवण देण्यात येते. मात्र ही योजना अद्याप पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त वीस ग्रामपंचायत मध्ये सुरू करण्यात आली आहे त्यामुळे गतिमान पद्धतीने अन्य ठिकाणीही योजना सुरू करण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे त्या मागणीची तात्काळ पूर्तता करण्यात यावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.

यावेळी सचिव अंकुश चव्हाण, मध्यान्ह भोजन कंपनीचे प्रतिनिधी भूषण पाताडे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + 15 =