You are currently viewing संरक्षण उत्पादन क्षेत्रातील आत्मनिर्भर भारत’ –  पंतप्रधान नरेंद्र मोदीची यासाठी ठोस पाऊले
संरक्षण उत्पादन क्षेत्रातील आत्मनिर्भर भारत' - पंतप्रधान नरेंद्र मोदीची यासाठी ठोस पाऊले

संरक्षण उत्पादन क्षेत्रातील आत्मनिर्भर भारत’ – पंतप्रधान नरेंद्र मोदीची यासाठी ठोस पाऊले

पंतप्रधान नरेंद्र मोदीची यासाठी ठोस पाऊले…..

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 27 ऑगस्ट रोजी संरक्षण उत्पादनातील आत्मनिर्भर भारत विषयावरील परिसंवादात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भाषण केले. संरक्षण क्षेत्रातील उत्पादनात आत्मनिर्भर होण्याची गरज यावर भर देताना पंतप्रधान म्हणाले की, आमचे उद्दिष्ट संरक्षण उत्पादनाला चालना देणे, नवीन तंत्रज्ञान विकसित करणे आणि संरक्षण क्षेत्रातील खाजगी उद्योगांना महत्वपूर्ण भूमिका देणे हे आहे.

या मोहिमेसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि त्यांच्या संपूर्ण गटाने झपाटल्यासारखे काम केले आणि अथक परिश्रम केले, यासाठी त्यांचे कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतामध्ये संरक्षण उत्पादनासाठी मोठी क्षमता आणि अनुकूल पर्यावरणीय यंत्रणा होती परंतु, अनेक दशकांपासून यासाठी कोणतेही प्रयत्न गांभीर्याने झाले नाहीत.

आधुनिक आणि स्वावलंबी भारत घडवण्यासाठी संरक्षण क्षेत्रात आत्मविश्वासाची भावना असणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. अनेक दशकापासून प्रलंबित असलेल्या सीडीएसच्या नियुक्तीसारखे निर्णय आता घेण्यात येत आहेत, जे नव भारताचा आत्मविश्वास दर्शवितात. संरक्षण प्रमुख पदाची निवडणूक केल्याने तीनही दलांमध्ये सुसंवाद आणि समन्वय निर्माण झाला असून संरक्षण खर्चात वाढ होण्यास मदत झाली आहे. त्याच प्रमाणे स्वयंचलित मार्गांनी ७४% एफडीआय परवानगी देऊन संरक्षण क्षेत्र सुरू केल्याने नवभारताचा आत्मविश्वास दिसून येईल.

ते म्हणाले, देशांतर्गत खरेदीसाठी भांडवली अर्थसंकल्पात काही भाग ठेवूण १०१ वस्तू उत्पादन केल्याने त्याद्वारे देशांतर्गत संरक्षण उद्योगांमध्ये भरभराट होईल. या खरेदी प्रक्रिया वेगवान करणे, चाचणी यंत्रणा सुलभ करणे इत्यादी कामांवर सरकार भर देत आहेत. एकदा हे पूर्ण झाल्यानंतर कामगार आणि संरक्षण क्षेत्र दोन्ही मजबूत होईल.

‘आधुनिक उपकरणांमध्ये आत्मनिर्भरतेसाठी तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण करण्याची गरज आहे’ यावर भर देताना ते म्हणाले की, डीआरडीओ व्यतिरिक्त खाजगी क्षेत्रातील शैक्षणिक संस्थांमधील संशोधन व नाविन्यपूर्णतेला सरकार प्रोत्साहन देत आहे. तसेच परदेशी भागीदारांसह संयुक्त उद्योगांच्या माध्यमातून सहउत्पादनावर भर ही दिला जात आहे. सुधारणा, सादरीकरण आणि रूपांतर यावर काम करून बौद्धिक संपत्ती, कर आकारणी, अवकाश आणि अणुऊर्जा या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुधारणा सुरू आहेत.

पायाभूत सुविधांच्या उपक्रमांवर उत्तर प्रदेश व तामिळनाडू येथे सुरू असलेल्या दोन दुव्यांबद्दल पंतप्रधान म्हणाले की, दोन्ही राज्यांच्या सहकार्याने अत्याधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी केली जात असून त्यासाठी येत्या ५ वर्षात 20 हजार कोटींचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. आयडीईएक्स उपक्रम जो उद्योजकांना खास करून एमएसएमई आणि स्टार्टॲप्सशी संबंधित आहे, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सुरू करण्यात आला असून या व्यासपीठाच्या माध्यमातून 50 पेक्षा अधिक स्टार्टअप्सने लष्करी वापरासाठी तंत्रज्ञान आणि उत्पादने विकसित केली आहेत.

जागतिक अर्थव्यवस्था अधिक दृढ, अधिक स्थिर आणि जगात शांतता निर्माण करण्यासाठी सक्षम भारत घडविणे हे आपले लक्ष्य आहे, असे पंतप्रधान म्हणाले. संरक्षण उत्पादनातील आत्मनिर्भर भारत या करिता ही कल्पना आहे की, आपल्या बऱ्याच मित्र देशांना संरक्षण उपकरणांचा विश्वासार्ह पुरवठादार करण्याची क्षमता भारतामध्ये आहे, यामुळे भारताची सामरिक भागीदारी बळकट होईल आणि हिंद महासागराच्या प्रदेशात निव्वळ सुरक्षा प्रदाता अशी भारताची भूमिका बळकट होईल. तसेच संरक्षण उत्पादन व निर्यात प्रोत्साहन धोरण आराखड्यांसंदर्भात मिळालेल्या अभिप्राय आणि सूचनामूळे हे धोरण लवकरात लवकर राबविण्यात येऊन आत्मविश्वास वाढवण्यासाठी व भारत आत्मनिर्भर होण्याचा आपला संकल्प सोडण्यात सामूहिक प्रयत्नांना मदत होईल, असे देखील पंतप्रधान म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 6 =