You are currently viewing विमा कंपनीच्या बदलत्या निकषांचा फटका शेतकऱ्यांना – सतिश सावंत

विमा कंपनीच्या बदलत्या निकषांचा फटका शेतकऱ्यांना – सतिश सावंत

वेंगुर्ला

विमा कंपनीच्या बदलत्या निकषांमुळे शेतक-यांचे नुकसान होणार असल्याने सिधुदुर्ग जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्याबाबत विचारणा करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँक चेअरमन सतिश सावंत यांनी केले. जिल्हाधिका-यांची शेतकरी व बागायतदार यांचे शिष्टमंडळ भेट घेणार असे आंबा, काजू बागायतदार मंचच्या सभेत एकमताने ठरविण्यात आले.
वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात आंबा, काजू बागायतदार शास्त्रज्ञ मंचची सभा अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सिधुदुर्ग जिल्हा बँकेचे चेअरमन सतिश सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला आंबा मार्केटिग, कॅनिग, विमा परिस्थिती यावर चमणकर यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी झालेल्या चर्चेत आंबा बागायतदार विवेक कुबल, सचिव विलास ठाकूर, दीपक भगत, महेश बोवलेकर, सदाशिव आळवे, प्रताप आसोलकर, बबन साळगांवकर, प्रताप गावस्कर, मांजरेकर, विष्णू मांजरेकर, प्रकाश डिचोलकर, प्रकाश गडेकर, निलेश चमणकर आदींनी सहभाग घेतला.
विमा कंपनीच्या यावर्षीच्या बदलत्या निकषाबद्दल संताप व्यक्त करुन शेतक-यांनी याविषयी तात्काळ जिल्हाधिका-यांशी चर्चा करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच आपल्या मालाचे मार्केटींग करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने शेतकरी बागायतदारांनी संघटीतपणे पुढे यायला हवे. शासनाकडून अशा मार्केटींग करण्यासाठी मदतीची गरज आहे. शेतावर वा बागायतीवर फवारण्या जास्त न होता दोन ते तीनच झाल्या पाहिजेत. यासाठी शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. सावंत यांनी विमा कंपनीच्या बदलत्या निकषांमुळे शेतक-यांचे नुकसान होणार असल्याने याबाबत जिल्हाधिकारी यांची शेतकरी व बागायतदार यांचे प्रतिनिधी शिष्टमंडळ भेट घेण्याचे ठरले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × one =