You are currently viewing वन्य प्राण्यांपासून झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा!

वन्य प्राण्यांपासून झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा!

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याकरिता हलगर्जीपणा नको

आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपवनसंरक्षक  रेड्डी यांना दिल्या सूचना

कणकवली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांकडून झालेल्या शेती, फळबागायती नुकसानीचे पंचनामे तातडीने करा. या करिता शासना कडून निधी आवश्यक असल्यास तो तातडीने पुरवठा केला जाईल. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरणात कोणतीही हलगर्जीपणा होऊ देऊ नका. अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपवनसंरक्षक नवा किशोर रेड्डी यांना दिल्या. कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी आमदार नितेश राणे यांची उपवनसंरक्षक श्री. रेड्डी यांनी भेट घेतली. यावेळी श्री. राणे यांनी गवा रेडे, माकडे व अन्य वन्य प्राण्यांमुळे शेती नुकसान संदर्भात उपवनसंरक्षक यांचे लक्ष वेधले. नुकसानी चे पंचनामे करण्यात कोणताही हलगर्जीपणा होऊ देऊ नका. अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

शासन स्तरावरून आवश्यक लागणारी निधीची तरतूद केली जाईल. याकरिता शेतकऱ्यांना निधी कमी पडणार नाही. परंतु तातडीने उपाय योजना करण्यात कोणतीही कसूर होता नाये असे श्री. राणे यांनी सांगितले. तसेच लोकवस्तीत बिबट्याच्या वाढलेल्या वावरा च्या संदर्भात देखील वनविभागाने ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना श्री राणे यांनी दिल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नवा किशोर रेड्डी हे उपवनसंरक्षक पदी रुजू झाल्याने आमदार नितेश राणे यांनी त्यांचे स्वागत केले. ही जागा रीक्त होती. ती भरण्याची मागणी श्री. राणे यांनी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − six =