You are currently viewing शेतकऱ्यांनी आपली मुख्य उत्पादक आंबा व काजू फळपिके त्यांचा विमा उतरुन संरक्षित करावीत

शेतकऱ्यांनी आपली मुख्य उत्पादक आंबा व काजू फळपिके त्यांचा विमा उतरुन संरक्षित करावीत

– सावंतवाडीचे तालुका कृषि अधिकारी

सिंधुदुर्गनगरी

दरवर्षी सातत्‍याने हवामानात होत असल्याने बदलाचा परीणाम फळपिकांवर व त्‍यांचे उत्‍पादनांवर होत असतो, अशावेळी शेतकऱ्यांनी आपली मुख्य उत्पादक असलेली आंबा व काजू फळपिके त्यांचा विमा उतरुन  शेतकऱ्यांनी संरक्षित करावीत. अधिक माहिती करिता क्षेत्रीय स्तरावरील कृषी सहायक कृषी पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकारी यांचेशी संपर्क करावा,असे आवाहन सावंतवाडीचे तालुका कृषि अधिकारी यांनी केले आहे.

 प्रधानमंत्री फसल बीमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानांवर आधारित फळपिक विमा योजना आंबा बहार 2021-22 मध्ये सावंतवाडी तालुक्यातील 5000 शेतकऱ्यांनी 2274.31 हेक्टर क्षेत्रावरील आंबा व काजू फळपिक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये, आंबा फळपिकाचे 1346.99 हेक्टर क्षेत्रातील 3127 शेतकऱ्यांनी व काजू फळपिकांचे 927.32 हेक्टर क्षेत्रातील 1873 शेतकऱ्यांनी विमा उतरविण्यात आला होता. या फळपिकांचे विमा संरक्षण कालावधीत झालेल्या हवामान बदलांचे घटकांचे आधारे,रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. यांच्याकडून काजू फळपिकाची 4 कोटी 88 लाख  रुपये व आंबा फळपिकाची 5 कोटी 6 लाख  रुपये असे एकूण 9 कोटी 94 लाख रक्कम रुपये शेतकऱ्यांचे खाती विमा नुकसान भरपाई म्हणून अदा केलेली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 − three =