You are currently viewing मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका करण्यापूर्वी आपली पात्रता काय याचा अभ्यास करूनच टीका करावी

मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका करण्यापूर्वी आपली पात्रता काय याचा अभ्यास करूनच टीका करावी

धनराज गोरे तालुकाध्यक्ष मनविसे

कणकवली

ज्यांना आचारसहिता काय असते..? हे माहीत नाही त्यांनी प्रथम प्रशासकीय अधिकाऱ्यांची आचारसहिता याचा अभ्यास करावा. अशाप्रकारे कोणाच्या घरी जाऊन प्रशासकीय अधिकारी बैठका घेत असतील. तर सर्वजण आपापल्या घरी बैठकांसाठी अधिकाऱ्यांना बोलावतील. आम. नितेश राणे हे जरी लोकांमधून निवडून आले. सत्ताधारी आम. असले तरी जिल्ह्यात इतरही आम. लोकप्रतिनिधी लोकांमधून निवडून आलेले आहेत. ते देखील जनतेच्या प्रश्ना संबंधित चर्चेसाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपापल्या घरी बोलावतील. सत्ताधारी आमदार नितेश राणे यांना हे सहन होईल का..? कवडीमोल जे राजकारणात नवखे आहेत ज्यांना कसला राजकारण समाजकारण याचा गंध नाही त्यांनी लक्षात घ्यावे.

दया मेस्त्री यांना खंडणी गुन्ह्यांबाबत न्यायालयाने निर्दोष ठरविले आहे. कोणताही गुन्हा त्यांच्यावर साबूत झालेला नाही. माजी आम. परशुराम उपरकर हे मागील दाराने निवडून आले असले तरी केंद्रीय मंत्री मा. खासदार नारायण राणे हे देखील मागील दारानेच निवडून आले आहेत. हे लक्षात घ्यावं. माजी. आम. परशुराम उपरकर यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडली आहे. अनेक भ्रष्टाचार उघडकिस आणून भ्रष्ट अधिकाऱ्यांना जिल्ह्याबाहेर घालवले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात माजी. आम. परशुराम उपरकर यांच मोठं राजकीय व सामाजिक योगदान आहे. याचं भान कवडीमोल टीकाकार यांनी ठेवावं.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज जिल्ह्यात प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका बजावताना दिसत आहे. जनतेच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवत आहे. मनसेकडे कार्यकर्ते कमी असले तरी जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरण्यास कमी पडत नाहीत. हे जिल्ह्यातील जनतेला चांगलेच ज्ञात आहे. मनसेला जिंकून येता आले नाही तरी मनसे कडे ठरवतील त्याला पाडण्याची ताकद आहे. भविष्यात मनसे देखील सत्तेत असेल हे अधोरेखीत करून ठेवा, असा उपरोधी टोलाही धनराज गोरे यांनी लगावला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा