You are currently viewing सावधान! कोरोना शंभर दिवसानंतर पुन्हा होऊ शकतो….

सावधान! कोरोना शंभर दिवसानंतर पुन्हा होऊ शकतो….

 

नवी दिल्ली :

 

भारतात कोरोना विषाणूचा दुसऱ्यांदा संसर्ग होण्याचा कालावधी १०० दिवस निश्चित करण्यात आला आहे. म्हणजेच रुग्ण एकदा कोरोनाच्या संसर्गातून बरा झाल्यानंतर त्याला १०० दिवसांनंतर पुन्हा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे, आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव यांनी ही माहिती दिली. देशात दुसऱ्यांना संसर्ग झाल्याचे तीन रुग्ण आढळून आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भार्गव म्हणाले, ‘‘भारतात कोरोनाच्या पुनर्संसर्गासाठी १०० दिवसांचा कालावधी लागत आहे. हा कालावधी म्हणजे अँटिबॉडीजचं जीवनमान आहे. अशा प्रकारची पुनर्संसर्गाची भारतात तीन प्रकरणे समोर आली आहेत. यांतील दोन रुग्ण मुंबईतील तर एक अहमदाबादमधील आहे. जागतीक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ) जगात सुमारे दोन डझन पुनर्संसर्गाची प्रकरणे समोर आली आहेत. दरम्यान, आम्ही आयसीएमआरचा डेटा तपासत आहोत. तसेच पुन्हा संसर्ग झालेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांच्याशी फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहोत.’

४५ पेक्षा अधिक वयाच्या लोकांना जास्त धोका

आरोग्य सचिव  यांनी सांगितले की, ‘४५ ते ६० वयोगट असणाऱ्यांन मध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण ३५ टक्के आहे. आर्थिक घडामोडी सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर या वयोगटातील रुग्णांना संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा तरुण वर्ग हा विचार करतो की आपल्या कमी वयामुळे आपले आरोग्य चांगले आहे, त्यामुळे संसर्ग होणार नाही किंवा ते लवकर बरे होतील. मात्र, हा चुकीचा समज आहे. भारतात कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट हा सातत्याने कमी होत आहे. दरम्यान, ८७ टक्के लोक कोरोनातून बरे झाले आहेत,’’ अशी माहितीही त्यांनी दिली.४५ ते ६० वर्षे वयाच्या गंभीर आजार असलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. या वयोगटात गंभीर आजार असलेल्या रुग्णांच्या कोरोनाच्या संसर्गाने मृत्यूचे प्रमाण १३.९ टक्के आहे, तर गंभीर आजार नसणाऱ्यांचे प्रमाण १.५ टक्के आहे. त्याचबरोबर ६० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असणा-यांचे ५३ टक्के मृत्यू झाले आहेत. तसेच १७ ते २५ वयोगटातील मृत्यूचे प्रमाण १ टक्का आहे, असेही त्यांनी सांगितले.

मात्र सलग ५ दिवस ९ लाखांहून कमी रुग्ण सापडल्याने तसेच रुग्ण पॉझिटिव्ह असण्याचे प्रमाण ६.२४ टक्के असल्याचे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले. जर सावधगिरी बाळगली गेली नाही तर सणांच्या आणि थंडीच्या काळात परिस्थिती बिघडू शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + 18 =