You are currently viewing कोविड मुळे पती गमावलेल्या कणकवली शहरातील विधवा महिलांना 25 हजाराचे अर्थसहाय्य – नगराध्यक्ष समीर नलावडे

कोविड मुळे पती गमावलेल्या कणकवली शहरातील विधवा महिलांना 25 हजाराचे अर्थसहाय्य – नगराध्यक्ष समीर नलावडे

कणकवली नगरपंचायतचा महत्त्वपूर्ण निर्णय

नाव नोंदणी करिता नगरपंचायत मध्ये कक्षाची स्थापना

कणकवली :

कोविड मुळे पतीचे निधन झालेल्या कणकवली शहरातील विधवा महिलांकरता नगरपंचायत च्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये कणकवली शहरातील नागरिक असलेल्या व कोविड काळात पती गमावलेल्या विधवा महिलांना नगरपंचायत च्या माध्यमातून 25 हजाराचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली. कणकवली नगराध्यक्ष दालनात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी नगरसेविका मेघा गांगण, नगरसेवक अभिजीत मुसळे, महेश सावंत, बंडू गांगण आदी उपस्थित होते. नगराध्यक्ष  नलावडे म्हणाले की पती गमावलेल्या महिलांना आर्थिक मदत देत त्यांना उद्योग व्यवसायात पाय रोवून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरून या अर्थसहाय्यातून महिलांनी उद्योग करून स्वतःच्या पायावर उभे राहावे. यासाठी नगरपंचायतचा हा प्रयत्न असल्याचेही श्री. नलावडे यांनी सांगितले. बहुदा जिल्ह्यात असा निर्णय घेणारी कणकवली ही सर्वप्रथम नगरपंचायत असणार आहे. ज्या महिलांच्या पतीचे कोविडने निधन झाले अशा महिलांचे मतदार यादी मध्ये नाव, रेशन कार्ड हे कणकवली शहरातील असण्याची गरज आहे. तसेच आधार कार्ड देखील आवश्यक आहे. याकरिता कणकवली नगरपंचायत मध्ये एक विशेष कक्षाची स्थापना करण्यात आल्याचे ही श्री नलावडे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − five =