You are currently viewing कणकवली तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत २९ जुलै ला होणार

कणकवली तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत २९ जुलै ला होणार

तिवरे व भिरवंडे या दोन ग्रामपंचायतींमध्ये एकही ओबीसी आरक्षण नसणार ?

कणकवली :

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गासाठी २७ टक्के राजकीय आरक्षण देण्याचे आदेश दिले. त्यानंतर ग्रामपंचायत स्तरावरील मतदार यादीनुसार तयार केलेल्या अहवालानुसार प्रभाग आरक्षण जाहीर होणार आहे. त्यानुसार प्रत्येक गावामधील ओबीसी प्रवर्गाच्या संख्येनुसार त्या त्या गावांसाठी ओबीसी सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे. यात ओबीसीसाठी एक सदस्य संख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या ४४ आहे. १५ ग्रामपंचायतीसाठी दोन ओबीसी सदस्य असणार आहेत . एका ग्रामपंचायतीसाठी तीन तर एकासाठी चार सदस्य ओबीसी प्रवर्गासाठी असणार आहेत. तर तिवरे व भिरवंडे या दोन ग्रामपंचायतींमध्ये एकही ओबीसी आरक्षण नसणार आहे.

दरम्यान, ६३ पैकी ५८ ग्रामपंचायतींची ही आरक्षण सोडत २९ जुलै रोजी त्या – त्या ग्रामपंचायतींमध्ये होणार आहे. मागासवर्गीय आयोगाच्यावतीने प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीच्या मतदार यादीनुसार त्या गावातील राजकीय आरक्षण निश्चित करत असताना मतदार यादीनुसार इम्पेरिकल डाटा गोळा करण्यात आला. हा डाटा आता सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्यामुळे निवडणूक आयोगाने ओबीसी समाजासाठी आरक्षण प्रभागनिहाय जाहीर करावे, असे निर्देश दिले आहेत.

यासाठी इम्पेरिकल डाटा आणि त्याची टक्केवारी तयार केली आहे. या टक्केवारीच्या आधारावर तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय आरक्षणातील ओबीसी आरक्षण निश्चित केले जाणार आहे.

२९ जुलै रोजी तालुक्यातील ६३ पैकी डिसेंबर २०२२ पूर्वी मुदत संपणाऱ्या ५८ ग्रामपंचायतींसाठी ही आरक्षण सोडत होणार आहे. यात भिरवंडे , गांधीनगर, तोंडवली – बावशी, ओटव व बेळणेखुर्द या ग्रामपंचायतींची निवडणूक यापूर्वी झालेली असल्याने तेथील आरक्षण आता काढले जाणार नाही. मात्र, तेथील पुढील निवडणुकांच्या अनुषंगाने आरक्षीत जागांची संख्या ठरविण्यात आली आहे.

तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींच्या निश्चित करण्यात आलेल्या ओबीसी आरक्षीत संख्येनुसार प्रत्येकी एक जागा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असणाऱ्या ग्रामपंचायती असलदे , आशिये, आयनल, बेळणे खुर्द, भरणी बिडवाडी, बोर्डवे, चिंचवली, डामरे, दारिस्ते, दारूम, दिगवळे, गांधीनगर, हळवल, हुंबरठ, जानवली, करंजे, करूळ, कसवण – तळवडे, कोळोशी, कोंडये, कुंभवडे, कुरंगवणे, माईण नडगिवे, नागवे, नांदगाव, ओटव, ओझरम, पिसेकामते, पियाळी, साकेडी , साळिस्ते, सातरल, सावडाव, शेर्पे, शिडवणे, शिरवल, तरंदळे, तोंडवली बावशी, वायंगणी, वाघेरी मठखुर्द, वारगाव व कासरल, घोणसरी, हरकुळ बुद्रुक, हरकुळ खुर्द, कळसुली , कासार्डे, खारेपाटण, लोरे, नरडवे, नाटळ, ओसरगाव, सांगवे, शिवडाव, तळेरे, वरवडे व वागदे येथे प्रत्येकी दोन जागा, कलमठ येथे तीन जागा तर फोंडाघाट येथे चार जागा ओबीसीसाठी राखीव होणार आहेत .

तर, तिवरे व भिरवंडे या दोन ग्रामपंचायतींमध्ये ओबीसीसाठी एकही जागा आरक्षीत होत नाही.

तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींची ही आरक्षण सोडत २९ जुलै रोजी त्या – त्या ग्रामपंचायतींमध्ये होणार आहे. सकाळी ११ व दुपारी २ अशा दोन सत्रांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होणार असून यासाठी ३१ अध्यासी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. आयोगाने निश्चित केलेल्या सूत्रानुसार ही कार्यवाही होत आहे. अध्यासी अधिकाऱ्यांना आरक्षण नमुन्याबाबतची सर्व माहिती देण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार आर . जे . पवार यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + four =