You are currently viewing नळ जोडणीसाठी खोदलेल्या चरांमुळे पडले खड्डे

नळ जोडणीसाठी खोदलेल्या चरांमुळे पडले खड्डे

भटवाडी येथील समस्येकडे बांधकाम व पाणी पुरवठा विभाग करीत आहे दुर्लक्ष; माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांनी वेधले मुख्याधिकारी यांचे लक्ष

सावंतवाडी

येथील भटवाडी येथे नळ जोडणीच्या कामावेळी खोदण्यात आलेल्या चारामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले असून पावसाळा तोंडावर आला तरी देखील खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे बांधकाम विभाग व पाणीपुरवठा विभाग आपली जबाबदारी एकामेकांवर ढकलत आहे या खड्ड्यामुळे अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत यामुळे याकडे माजी नगरसेवक दिपाली भालेकर यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांचे लक्ष वेधले आहे आहे.  अपघातात जीवित हानी झाल्यास त्याला पाणीपुरवठा विभाग बांधकाम विभाग व प्रशासन जबाबदार असेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा