You are currently viewing भाजपची सत्ता पुढची ५० वर्षे कायम राहील… केंद्रीय मंत्री नारायण राणे 

भाजपची सत्ता पुढची ५० वर्षे कायम राहील… केंद्रीय मंत्री नारायण राणे 

सागरी अतिक्रमण बाधित देवबाग किनारपट्टीवर खासदार निधीतून बंधारा उभारणी कामाचा शुभारंभ : देवबाग ग्रामस्थांशी साधला संवाद

मालवण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथाकडे वाटचाल करत असताना महाराष्ट्रातील सरकार मात्र राज्य लुटण्याचे काम करत आहे. विकास, प्रगती, दरडोई उत्पन्न यात महाराष्ट्र मागे पडत आहे. त्यामुळे लवकरच हे सरकार जाऊन महाराष्ट्रात भाजपचे सरकार येईल. देशाबरोबर महाराष्ट्रात पुढील ५० वर्षे भाजपची सत्ता कायम राहील. असा ठाम विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देवबाग येथे रविवारी व्यक्त केला.

दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यातील मंत्री, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना आमदार, खासदार यांच्यावर ना. नारायण राणे यांनी जोरदार प्रहार केला. शिवसेनेची तेव्हाची भूमिका आणि आताची भूमिका बदलली आहे. ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. ही बकरी सेना झाली आहे. अशीही कडवट टीका राणे यांनी केली.

सागरी अतिक्रमणाचा धोका वाढलेल्या देवबाग किनारपट्टीवर अत्यावश्यक ठिकाणी त्वरीत बंधारा बांधण्याची गरज निर्माण झाली. ही बाब लक्षात घेता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक कोटींचा खासदार निधी तात्काळ उपलब्ध करून दिला. या बंधारा उभारणी कामाचे भूमिपूजन रविवारी ना. नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हासरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, मोहन कुबल, महेश मांजरेकर, विजय केनवडेकर, दाजी सावजी, फादर संजय, भटजी व देवबाग ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी देवबाग ग्रामस्थांच्या वतीने ना. नारायण राणे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. देवबाग गावच्या शिवसेना सरपंच यांचे पती मनोज खोबरेकर यांनीही ना. नारायण राणे यांचे विशेष स्वागत केले.

यावेळी बोलताना भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे म्हणले, राणे साहेबांनी ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्ण केला. जिल्हाधिकारी यांनी खासदार निधीतुन होणाऱ्या बंधारा उभारणी कामास एका मिनिटात मंजुरी दिली. जिल्हाधिकारी यांनी जनतेसाठी दाखवलेली तत्परता आमदार वैभव नाईक यांना आठ वर्षात दाखवता आली नाही. आठ वर्षात बंधारे बांधले नाहीत मात्र राणे साहेबांनी बंधाऱ्यासाठी एक कोटी निधी देताच बंधारे मी आणले म्हणून भूमिपूजने सुरू केली. राणे साहेबांनी निधी आणला त्यानंतर आमदारला जाग आली. मात्र कमिशन घेऊन कामे सुरू आहेत. एवढ्या छोट्या मनाचा आमदार महाराष्ट्रात पाहिला नाही. अशी टीका निलेश राणे यांनी केली.

कोरोना अगोदर केलेल्या कामांचे भूमिपूजन आमदार करतो. या आमदाराला विधानसभेत कोण ओळखत नाही. यापूर्वीचे इथले आमदार विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे. आणि आता कोण आमदार ? हे चित्र बदलले पाहिजे. आठ वर्षात मतदारसंघात काही मिळाले नाही. सरकारी पैसे कधीतरी येतात आणि कामे होतात. यापलीकडे आमदाराचे काम नाही. अशी टीका निलेश राणे यांनी केली.

२०२४ ला महाराष्ट्रात भाजपचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. विकासकामे भाजपच्या माध्यमातून झाली आणि यापुढेही होतच राहतील. असा ठाम विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, १९९० साली पहिल्यांदा निवडून आलो तेव्हा देवबाग ग्रामस्थांनी बंधारा मागणी केली. बंधारा बांधला. रस्ता बांधला, गाव वाचवले यापुढेही देवबाग गावाच्या पाठीशी ठाम उभे राहणार. मात्र जनतेला फसवणारे लोकप्रतिनिधी यापुढे नको जनतेने विचार करावा.

आज केंद्रीय मंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जबाबदारी दिली. ती यशस्वी पार पाडत आहे. काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या यादीत लघु सूक्ष्म मध्यम उद्योग मंत्रालय एक नंबरला आहे. असे काम माझे मंत्रालय करत आहे. या तुम्हा जनतेचा आशीर्वाद आहे. येथील जनतेने मला नेहमीचप्रेम दिले. मी विसरू शकत नाही. देशातील माझा सर्वात आवडता तालुका मालवण असल्याचे ना. राणे म्हणाले.

आपल्या जवळ पोहचणारे विरोधक येथे नाहीत. आठ वर्षात येथील आमदाराला बंधारा प्रश्न का सोडवता आला नाही. जनतेचा विकास करण्याची धमक कोणात आहे ? हे जनतेने ओळखावे. या आमदारात धमक हिम्मत नाही. असेही राणे म्हणाले. मुख्यमंत्री फक्त बोलतात काम कुठे आहे. राज्य दिवाळखोरीत जात आहे. विकास ठप्प आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रक्रिया उद्योग आले पाहिजेत. माश्यावर प्रक्रिया करणारे उद्योग झाले पाहिजेत. पर्यटन, काथ्या उद्योग या माध्यमातून प्रत्येक घरात विकास झाला पाहिजे. माझे सहकार्य कायम असेल असेही ना. नारायण राणे म्हणले.

मुख्यमंत्री काचेच्या मातोश्रीत राहतात. बोलत नाहीत, चालत नाही. जनतेला भेटत नाही. गद्दारी करून सत्ता मिळवली. वादळ नुकसानीत सिंधुदुर्गला २५ कोटी देतो म्हणाले, कुठे आहेत ?राज्यात विकासाचे एक मोठे काम केले तर सांगावे. आज मराठी माणूस मुंबईत राहिला नाही. हे आहुवसेनेचे काम का ? असाही सवाल ना. राणे यांनी उपस्थित केला.

जनता अश्या सत्ताधारी मंडळींना त्यांची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही. आत्मनिर्भर भारत बनवणाऱ्या भाजपच्या पाठीशी जनता ठाम उभी राहिल. असा विश्वास ना. राणे यांनी व्यक्त केला.

एकूणच सिंधुदुर्ग, मालवण, देवबाग वर असलेले आपले प्रेम येथील जनतेबद्दल असलेली आपुलकी ना. राणे यांनी व्यक्त केली. भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर व भाजप पदाधिकारी यांच्या वतीने तालुक्यात सुरू असलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले.

यावेळी मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, भाजप जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनीही विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने देवबाग ग्रामस्थ उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + 17 =