You are currently viewing तळाशील वासीयांना दिलेला शब्द आ. वैभव नाईक यांनी पाळला

तळाशील वासीयांना दिलेला शब्द आ. वैभव नाईक यांनी पाळला

*तळाशील गावातील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ*

*तळाशील वासीयांकडून आ. वैभव नाईक यांच्याबद्दल कौतुकोद्गार*

 *देवबाग मोबार येथील बंधाऱ्याचे उद्या आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन*

 

तळाशील येथे समुद्रकिनारी धुप्रतिबंधक बंधारा नसल्याने अतिवृष्टी व समुद्री उधाणाच्या वेळी येथील ग्रामस्थांच्या घरांना धोका पोहचत आहे. ऑगस्ट महिन्यात येथील ग्रामस्थांनी उपोषण छेडले होते. त्यावेळी उपोषण स्थळी आ.वैभव नाईक यांनी भेट देऊन तळाशील वासीयांना धुप्रतिबंधक बंधारा बांधण्याचा शब्द दिला होता. आ. वैभव नाईक यांनी दिलेला शब्द पाळला असून तळाशील गावात तीन ठिकाणी धूपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी ४ कोटी ५७ लाख रु मंजूर करून घेतले असून बंधाऱ्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. आज आ. वैभव नाईक यांच्या हस्ते बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ झाला. पहिल्यांदाच तळाशील मध्ये एकाच वेळी ८५० मीटरचा बंधारा बांधण्यात येत असून आ. वैभव नाईक यांनी दिलेला शब्द पाळल्याने तळाशील वासीयांकडून त्यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढण्यात आले. *त्याचबरोबर देवबाग मोबार येथे धुप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी ४ कोटी रु मंजूर केलेले असून उद्या या धुप्रतिबंधक बंधाऱ्याचे भूमिपूजन आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.*

 

यामध्ये तळाशील समुद्रकिनारी धुपप्रतिबंधक बंधारा बांधणे निधी १ कोटी २७ लाख ६७ हजार रु. तळाशील समुद्रकिनारी श्री.सावळाराम धाकू चोडणेकर यांचे घर ते राजन चंद्रकांत कोचरेकर यांच्या घरापर्यंत धुपप्रतिबंधक बंधारा बांधणे निधी २ कोटी २० लाख ७ हजार रु. व तळाशील समुद्रकिनारी राजन चंद्रकांत कोचरेकर यांच्या घरासमोर धुपप्रतिबंधक बंधारा बांधणे निधी १ कोटी ९ लाख २७ हजार रु. या तीन बंधाऱ्यांची कामे मंजूर झाली असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. हे बंधारे मंजूर झाले होते मात्र सीआरझेड व इतर परवानग्या मिळत नव्हत्या मात्र आमदार वैभव नाईक यांनी प्रशासकीय स्तरावर व राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.त्यामुळे आता परवानग्या मिळाल्याने बंधाऱ्याची कामे गतीने सुरू करण्यात आली आहेत. उर्वरित बांधऱ्यांसाठी सीआरझेड परवानगीचे प्रस्ताव सादर केले आहेत. येत्या वर्षभरात सर्व ठिकाणी बंधारा बांधण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. अशी माहिती आ.वैभव नाईक यांनी दिली.

 

*जेष्ठ मच्छीमार नेते जयहरी कोचरेकर म्हणाले, ऑगस्ट महिन्यात ग्रामस्थांनी उपोषण केले तेव्हा आ. वैभव नाईक यांच्यावर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्यांनी त्याचा राग मनात न ठेवता लोकांची नाराजी दूर करण्यासाठी धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्याचे वचन दिले.आज त्यांच्यामुळे धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम होत आहे त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो.*

 

*संजय केळुसकर म्हणाले, दिलेला शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी हि प्रत्येकाची असते. आ. वैभव नाईक यांनी देखील बंधारा बांधण्याचा दिलेला शब्द पाळला आहे.ग्रामस्थांच्या नाराजीची दखल घेऊन त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली. त्यामुळे बंधारा होत आहे याचा आम्हाला आनंद आहे. असे सांगत आ. नाईक यांचे आभार मानले.*

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, पतनचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत आचरेकर, सहाय्यक पतन अभियंता पि. बी. पवार, सहाय्यक अभियंता समाधान जाधव, कनिष्ठ अभियंता प्रमोद मोडक, ठेकेदार प्रतिनिधी गौरव मोडक,तळाशील सरपंच आबा कांदळकर, संजय केळुसकर, जयहरी कोचरेकर, ललित देऊलकर, नंदकुमार कोचरेकर, विजय रेवंडवर, गोपाळ मालंडकर, विवेक रेवंडकर, भाऊ मायबा, जयेश केळुसकर, भिकाजी रेवंडकर, प्रकाश बापर्डेकर, संतोष कांदळगावकर, तात्या टिकम, बबन तारी, रामा तांडेल, महेश मालंडकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + 13 =