You are currently viewing नांदगाव येथे महामार्ग प्राधिकरणच्या गलथान कारभारामुळे महिलेचा अपघाती मृत्यू

नांदगाव येथे महामार्ग प्राधिकरणच्या गलथान कारभारामुळे महिलेचा अपघाती मृत्यू

कणकवली

मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव तिच्यावरील उड्डाणपुलावर देवगडकडे जाणाऱ्या मार्गाच्या ठिकाणी महामार्ग प्राधिकरण कडून अचानक गतिरोधक बसविण्यात आले आहेत. आज दुपारनंतर कोणतेही पट्टे किंवा सूचनाफलक न लावता हे गतिरोधक करण्यात आल्यामुळे दुचाकीचा अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली मसुरे येथील महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.हा अपघात रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताला जबाबदार कोण ?असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.जोपर्यंत गतिरोधक काढत नाही,तोपर्यंत रास्तारोको करण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे व पोलीस दाखल झाले आहेत.मृतदेह अपघात स्थळी आहे,ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे.महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना जाब विचारला जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 5 =