You are currently viewing वैभववाडीत भाजपला सोडचिठ्ठी देत ग्रामपंचायत सदस्यांसह तंटामुक्त समिती अध्यक्षांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

वैभववाडीत भाजपला सोडचिठ्ठी देत ग्रामपंचायत सदस्यांसह तंटामुक्त समिती अध्यक्षांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

अमित सामंत यांच्या संघटनात्मक कार्यप्रणाली मुळेच भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

वैभववाडी :

तालुक्यातील कोळपे गावातील भाजपच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज वैभववाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. यामध्ये तंटामुक्त समिती अध्यक्ष विशाल जाधव, ग्रामपंचायत सदस्या ऋतुजा जाधव, आनंद जाधव, राजेश जाधव, मुस्कान रमदूल, तौफिक राऊत, नाजिया पाटकर यांच्यासह अनेक जणांचा सहभाग आहे. यावेळी बोलताना विशाल जाधव यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळ चिन्हाचा झेंडा हातात घेऊन यापुढे वैभववाडी तालुक्यातील संघटना मजबूत करण्यासाठी गावा गावात जाऊन प्रत्येक कुटुंबाची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार आणि महत्व पटवून देण्यासाठी अहोरात्र जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे सांगितले.

भाजपचे विद्यमान तालुकाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य नाशीर काझी यांच्या मतदारसंघातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने नासीर काझी यांना एक प्रकारचा संघटनात्मक धक्का मानला जात आहे.

यावेळी अमित सामंत प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष डॉ. अभिनंदन मालंडकर, प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, मालवण माजी उपसभापती नाथा मालणकर, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, रोहिदास पवार, रमेश चव्हाण, नंदकुमार पवार, अरुण सरवणकर, साजिद पाटणकर आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सांगितले की, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा पक्षात योग्य तो सन्मान केला जाईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + four =