You are currently viewing रोणापाल ग्रामपंचायतचे पाण्यासाठी आमरण उपोषण सुरू

रोणापाल ग्रामपंचायतचे पाण्यासाठी आमरण उपोषण सुरू

सावंतवाडी

अधिकाऱ्यांनी आश्वासन देऊन देखील अद्याप पर्यंत तिलारी कालव्यातील पाणी रोणापाल पर्यंत न आल्याने आज रोणापाल ग्रामपंचायतच्या वतीने येथील तिलारी कार्यालयाकडे आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.

या उपोषणाला सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री प्रमोद गावडे तसेच वासुदेव जोशी (सरपंच नाणोस) , दिनानाथ कशाळीकर (सरपंच सातोळी) बावळाट , समीर गावडे (सरपंच, निगुडे) विजय वालावलकर उपसरपंच, मडुरा, गुरुदास गवंडे उपसरपंच, निगुडे भिकाजी केणी उपसरपंच रोणापाल, विलास सावंत (अध्यक्ष सिंधुदुर्ग फळ बागायतदार) उदय देऊलकर (माजी सरपंच रोणापाल) जगन्नाथ पंडित, प्रकाश वालावलकर (मा. ग्रामपंचायत सदस्य मडुरा) , अरुण पंडित, नितीन मावळणकर, सुदीन गावडे आदीं उपस्थित राहून उपोषणास पाठिंबा दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा