You are currently viewing प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा मच्छिमार बांधवानी लाभार्थी बनुन आत्मनिर्भर बना….

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा मच्छिमार बांधवानी लाभार्थी बनुन आत्मनिर्भर बना….

आत्मनिर्भर अभियान संयोजक अतुल काळसेकर यांचं आवाहन

वेंगुर्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून आत्मनिर्भर अभियान अंतर्गत मच्छिमारांसाठी मत्स्यसंपदा योजना आणली आहे . या योजनेसाठी २० हजार कोटी ची तरतुद केली आहे . त्याचा फायदा जास्तीत जास्त मच्छिमार बांधवानी घेऊन आत्मनिर्भर बना असे आवाहन आत्मनिर्भर अभियानाचे सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक अतुल काळसेकर यांनी केले .

वेंगुर्ले येथे साईमंगल कार्यालय येथे भाजपाच्या वतीने आयोजित केलेल्या आत्मनिर्भर अभियान संवाद कार्यशाळेला मच्छिमारांचा उस्फूर्त प्रतीसाद लाभला. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष राजन गिरप, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, अभियानाचे सहसंयोजक विजय केनवडेकर, सावंतवाडी विधानसभा संयोजक एकनाथ नाडकर्णी, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, मच्छिमार नेते वसंत तांडेल, वेंगुर्ले मच्छिमार सोसा. चेअरमन राजु कुबल, केळुस मच्छी.सोसा. चेअरमन गोविंद केळुसकर, मालवणचे मच्छिमार नेते अशोक तोडणकर, जिल्हा चिटणीस सुधीर दळवी, जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, मच्छिमार सेलचे ता.अध्यक्ष बाबा नाईक उपस्थित होते .

यावेळी मार्गदर्शन करताना अतुल काळसेकर यांनी मच्छिमारांसाठी ज्या वेगवेगळ्या योजना व त्यासाठी शासनाकडून मिळणारे अनुदान याचे विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच मच्छिमारांनी आधुनिकीकरणाची कास धरण्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या पॅकेजचा फायदा घेऊन आपली उन्नती साधली पाहिजे. तसेच शेतकरी गटाप्रमाणे मच्छिमारांनी आपले गट स्थापन करुन शासकीय योजनांचा फायदा घ्यावा व यात महिला भगिनींना सामावून घ्यावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी अनेक मच्छिमारांनी चर्चेमध्ये उस्फूर्त पणे सहभाग घेतला.
यावेळी या कार्यक्रमाला शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण, सोमनाथ टोमके, ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर, नगरसेवक प्रशांत आपटे, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, उभादांडा उपसरपंच गणपत केळुसकर, वायंगणी उपसरपंच हर्षद साळगांवकर, ता.चिटणीस जयंत मोंडकर व समीर चिंदरकर, बुथप्रमुख प्रकाश मोटे व देवेंद्र ( बाळु ) वस्त व नागेश सारंग, माजी चेअरमन गणपत चोडणकर, ट्राॅलर संघटनेचे बाबी रेडकर, मोहन सागवेकर, अशोक खराडे, रविंद्र शिरसाठ, सतीष मोरजे, संतोष साळगांवकर, अनंत केळजी, शांती केळुसकर, बाळकृष्ण हुले, सोमकांत सावंत, गोपाळ बटा, सुधाकर वेंगुर्लेकर, जानुराव चोडणकर, प्रसाद पेडणेकर, भाऊ सामंत ( मालवण),गणेश कुशे ( नगरसेवक – मालवण), नरेंद्र जामसंडेकर ( सर्जेकोट ), संदीप पाटील, सुधीर पेडणेकर, गणेश गावडे, वसंत गावडे इत्यादी जवळ जवळ १०० मच्छिमार बांधव उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + 14 =