You are currently viewing महाडचा सत्याग्रह

महाडचा सत्याग्रह

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी सचिन मस्कर यांची काव्यरचना

महाडचा सत्याग्रह
ऐतिहासिक झाला
मानवधर्म श्रेष्ठ असतो
याचा दाखला मिळाला..

सत्याग्रह आंबेडकरांनी
केला चवदार तळ्यावर
सकारात्मक परिणाम
झाला समाजमनावर..

संकुचित विचारसरणी
त्यांनी मोडीत काढली
समतेची विचारफुले
समाजात गंधाळली..

खऱ्या अर्थाने झाले
महाडचे तळे चवदार
सर्वधर्मीयांना मिळाला
पाण्याचा अधिकार..

©️®️ सचिन मस्कर , नवी मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा