You are currently viewing पावशी ग्रामपंचायतच्या नूतन इमारतीचे खा. विनायक राऊत,आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

पावशी ग्रामपंचायतच्या नूतन इमारतीचे खा. विनायक राऊत,आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

७५ लाख रु खर्च करून भव्य इमारतीची उभारणी

इमारतीत आपले सरकार सेवा केंद्र व व्यायामशाळा सुविधा

खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनेतून ७५ लाख रु निधी खर्च करून पावशी ग्रामपंचायतची भव्य नूतन इमारत उभारण्यात आली आहे. या इमारती मध्ये आपले सरकार सेवा केंद्र, व्यायामशाळा या सुविधा सुरु करण्यात आल्या असून आज याचा उदघाटन सोहळा खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते पार पडला. यावेळी फीत कापून नामफलकाचे अनावरण करण्यात आले.

खासदार विनायक राऊत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजवर अनेक घोषणा करण्याचे काम अनेकांनी केले परंतु त्यांना केलेल्या घोषणा पूर्ण करण्यास जमले नाही. मात्र शिवसेनेने जो शब्द दिला तो पाळला आहे. त्यामुळेच विमानतळ ,शासकीय मेडिकल कॉलेज व जिल्ह्यातील इतर महत्वाचे प्रश्न मार्गी लागले. आपल्या गावात ग्रामपंचायत वास्तू कशी असावी याचे चांगले उदाहरण म्हणजे पावशी ग्रामपंचायत ईमारत होय. ही वास्तू कशा पद्धतीने बांधली गेली आहे. ते सर्वांनी पाहावे. असे सांगत खा. विनायक राऊत यांनी ग्रामपंचायतच्या नवीन बॉडीचे कौतुक केले. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेत मनमानी कारभार सुरू असून त्याचाही पोलखोल माझे जि. प. सदस्य लवकरच करतील असेही त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, पावशी हे गाव कुडाळ शहराच्या अत्यंत जवळचे गाव आहे. गावाच्या विकासासाठी सर्वांनी योगदान दिले आहे. सरपंच बाळा कोरगावकर, उपसरपंच दीपक आंगणे व ग्रा. प. सदस्य यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील सर्वात मोठी सुमारे ४ हजार स्के.फूटची ग्रामपंचायत इमारत उभारण्यात आली. मोठ्या प्रमाणात गावचा विकास झाला. माझ्या फ़ंडातून ४० लाख रु या इमारतीसाठी दिले आहेत. गावातील रस्ते, नळपाणी योजना, बंधारा, स्ट्रीट लाईट, सबस्टेशनवरून विद्युत पुरवठा,महामार्ग अंडरपास अशी अनेक कामे मार्गी लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत म्हणाले, पावशी जि. प. मतदारसंघात काम करताना खा. विनायक राऊत , आ. वैभव नाईक, पालकमंत्री उदय सामंत, आ.दीपक केसरकर यांनी मला भरघोस निधी दिल्यानेच पावशी गाव विकास कामात अग्रेसर राहिला. विरोधकांना आम्ही काय मॉडेल आहोत ते दाखवून दिले. असे त्यांनी सांगितले.

सरपंच बाळा कोरगावकर म्हणाले,आपण निवडणूक रिंगणात उतरल्या नंतर माझ्या गावच्या ग्रामस्थांनी एक हाती सत्ता मिळवून दिली.आमचे खासदार, आमदार यांच्याकडे ज्या ज्या वेळी निधीची मागणी केली त्या त्या वेळी त्यांनी आवश्यक निधी कमी पडू दिला नाही.त्यामुळेच ५ वर्षात विकासाची गंगा गावात आणली गेली असे सांगितले.

या कार्यक्रमानिमीत्त पावशी गावातील माजी सरपंचांचा सत्कार, माजी सैनिकांचा सत्कार, बचत गट अध्यक्ष सदस्यांचा सत्कार, अपंगांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर कन्या रत्न लाभलेल्या महिलांचा सत्कार व त्यांच्या नावे ग्रामपंचायतच्या माध्यमातून एफ.डी. काढण्यात आली.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जि. प. गटनेते नागेंद्र परब, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, अतुल बंगे, छोटू पारकर,अवधूत मालवणकर, सरपंच बाळा कोरगावकर, उपसरपंच दीपक आंगणे, नेरूर सरपंच शेखर गावडे, हुमरस सरपंच अनुप नाईक, सरंबळ सरपंच सौ. साटम, हुमरमळा सरपंच जान्हवी पालव, पिंगुळी सरपंच सौ. पालकर, अणाव सरपंच आप्पा मांजरेकर, आवळेगाव सरपंच सुनील सावंत, शिवापूर सरपंच यशवंत कदम, पाट सरपंच रीती राऊळ सीमा खोत, चित्रा पावसकर, वैशाली पावसकर, यशश्री तेली, भाग्यश्री पावसकर, सागर भोगटे, प्रसाद शेलटे, दिनेश वारंग, अनुजा तेंडुलकर, सुचित्रा तुळसुलकर, प्रणिता नाईक, उत्तरा धुरी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 3 =