You are currently viewing शायरी

शायरी

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरविंदजी ढवळीकर यांची शायरी

तू भेटलीस मज जेंव्हा बघ हवा बदलली होती
हातात हात तू देता मग वाट उजळली होती

निःशब्द नजरही खाली मी विचारता तुज कांही
परी वाऱ्याने बटा उधळता तू दिसें लाजली होती

तू बोललीस ना कांही जे कवितेत उतरले होते
त्या शब्दांच्या किरणांनी तुज साद घातली होती

कोजागिरी सुखाची नशिबात कुणाच्या असते
चन्द्रासही वाटून हेवा बघ ती रात्र लांबली होती

जन्म या मिठीतच जावो मरणही पौर्णिमा भासो
कधी म्हणो आठवून सारे शायरी चांगली होती

अरविंद

प्रतिक्रिया व्यक्त करा