You are currently viewing डेगवे-आंबेखणवाडीच्या श्री ब्राह्मणी तीर्थक्षेत्राच्या जिर्णोध्दाराचे काम पूर्ण

डेगवे-आंबेखणवाडीच्या श्री ब्राह्मणी तीर्थक्षेत्राच्या जिर्णोध्दाराचे काम पूर्ण

भाविकात समाधान…!

बांदा

आजच्या लोकशाही युगातही देवस्थाने हि गावाची व वाडी वस्तीवरील श्रद्धास्थाने आहेत.त्याचें जतन केले पाहिजे आशी ग्रामस्थांची धारणा आहे.देव देवस्थाना बाबत प्रसिद्ध असणाऱ्या कोकणातील सावंतवाडी तालुक्यातीलआमच्या डेगवे गावात ग्राममंदिरे आहेत.त्याचप्रमाणे गावातील प्रत्येक वाडीत “ब्राह्मणीस्थळे” आहेत.त्यामुळे सदर ठिकाणी गावातील प्रत्येक वाडीतील ग्रामस्थ आपापल्या “ब्राह्मणीस्थळात” प्रतिवर्षी ब्राह्मण भोजन व श्री सत्यनारायणाची महापुजा इत्यादी कार्यक्रम मोठ्या भक्तीभावाने साजरे करतात.
अशाच प्रकारे सावंतवाडी तालुक्यातील डेगवे- आंबेखणवाडीत “ब्राह्मणी स्थळ” आहे. त्यामुळे सदर ठिकाणी प्रतिवर्षी “ब्राह्मण भोजन” “,श्री सत्यनारायणाची महापुजा,गौरी पुजन-विसर्जन,वटपौर्णिमा,श्रावण महिन्यात “सात सोमवारचे व्रत” करणे,त्या नंतर ७ व्या सोमवारी देवतांवर “अभिषेक”करणे.भजन,करणे व विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तीभावाने ग्रामस्थ साजरे करतात
म्हणून सदर ठिकाणी “सार्वजनिक तुळशीवृंदावन” डिसेंबर १९८७ मध्ये बांधले आहे.त्या नंतर तेथील परीसराचे टप्याटप्याने जिर्णोध्दाराचे काम पूर्ण केले आहे.डेगवे- आंबेखणवाडीच्या मध्यवर्ती व वाडीची “छान” असलेल्या या ठिकाणी “श्री ब्राह्मणी तीर्थक्षेत्र” व्हावे अशी नियतीची इच्छा आहे.
त्यामुळे फेब्रुवारीवारी २०२१ मध्ये सदर परीसराच्या जिर्णोध्दाराचे काम ग्रामस्थांनी हाती घेतले. आणि बघता,बघता सर्व ग्रामस्थ बांधवांनी,नोकरी-व्यवसाय करणाऱ्यांनी,माहेरवाशिणीनी,हितचिंतक भाविकानी भरघोस देणगी देऊन आर्थिक सहकार्य केले.
धावत्याला शक्ती येई आणि मार्ग सापडे या उक्तीप्रमाणे जिर्णोध्दाराचा हा मोठा पल्ला जिर्णोध्दार समिती गाठू शकली.
त्यामुळे श्री ब्राह्मणीस्थळाच्या हाती घेतलेल्या परीसराचे रंगकाम पूर्ण केले आहे. त्यामुळे श्री स्थापेश्वर मंदिर ते डिंगणे रस्त्यावरील श्री ब्राह्मणीस्थळाचा सदर परीसर सुशोभित दिसत असून भाविकांचा लक्ष वेधून घेत आहे.
श्री ब्राह्मणीस्थळाचा रुपाने डेगवे– “आंबेखणवाडीची किर्ती” सर्वदुर पसरेल.शिवाय ब्राह्मणीस्थळाच्या रुपाने “आंबेखणवाडी च्या” गौरवशाली वैभवात नव्याने भर पडेल.असे मत डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे सरचिटणीस तथा ग्रंथमित्र श्री उल्हास देसाई यांनी व्यक्त केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + 19 =