You are currently viewing कळणेतील नुकसानग्रस्तांना ३१ ऑक्टोंबर पर्यत नुकसानी मिळणार…

कळणेतील नुकसानग्रस्तांना ३१ ऑक्टोंबर पर्यत नुकसानी मिळणार…

खनिकर्म अधिका-यांचे आश्वासन; ग्रामस्थांनी पुकारलेले आंदोलन अखेर मागे…

सावंतवाडी

कळणे येथील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ३१ ऑक्टोंबर पर्यंत नुकसान भरपाई दिली जाईल,असे लेखी आश्वासन खनिकर्म अधिकारी अजित पाटील यांनी दिले.त्यानंतर कळणे येथील ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. दरम्यान माजी आमदार तथा मनसे नेते परशुराम उपरकर यांनी मध्यस्थी केली. तेथील ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास लोकआयुक्तांकडे आणि न्यायालयात याबाबत दाद मागणार,असेही यावेळी श्री उपरकर यांनी सांगितले.
कळणे मायनिंगची माती कोसळल्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत भरपाई मिळाली नाही, त्यामुळे आज संतप्त नुकसानग्रस्तांनी प्रशासनासह कंपनीच्या विरोधात गुरांना घेऊन प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. मात्र खनिकर्म अधिकार्‍यांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. तर प्रांताधिकारी प्रशांत पानवेलकर, दोडामार्ग तहसीलदार अरुण खानोलकर,यावेळी मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार, उपतालुका अध्यक्ष सुधीर राऊळ,संतोष भैरवकर,दया मेस्त्री,कौस्तुभ हरमलकर,मंगेश वरक,राजेश टंगसाळे,प्रेमानंद देसाई,गोविंद मोर्ये,प्रिया नाईक,अरुण देसाई, मिलिंद नाईक,प्रकाश परब, अभय देसाई,मानसी देसाई, चंद्रकांत परब,जयसिंग देसाई, वैशाली देसाई आदी कळणेतील शेतकरी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + four =