You are currently viewing विजय कदम यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादीला फरक नाही

विजय कदम यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादीला फरक नाही

सावंतवाडी

विजय कदम हे गेले वर्षभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून अलिप्त होते. पक्षवाढीसाठी त्यांच्याकडून कुठच्याही प्रकारच योगदान नसल्यानं सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. जयदेव गायकवाड यांनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी काढून घेत सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दीपक जाधव यांच्याकडे सुपूर्द केली होती. दीपक जाधव हे सध्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष असून विजय कदम यांच्याकडे राष्ट्रवादीच कोणत्याही प्रकारच पद नाही आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणत्याही प्रकारचा फरक पडणार नाही. त्यांच्या जाण्याने कोणताही धक्का पक्षाला बसला नसुन भविष्यात धक्के काय असतात हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अनुभवायला मिळेल, धक्के पचवायची तयारी मित्रपक्षातील नेत्यांनी ठेवावी. यासाठी कॉंग्रेसच्या जिल्हास्तरीय नेत्यांना आमच्या शुभेच्छा असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष अरूण जाधव यांनी लगावला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × two =