You are currently viewing विराट कोहली टी 20 वर्ल्ड कपनंतर कॅप्टन्सी सोडणार, पुढचा कर्णधार कोण?

विराट कोहली टी 20 वर्ल्ड कपनंतर कॅप्टन्सी सोडणार, पुढचा कर्णधार कोण?

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली टी 20 वर्ल्ड कपनंतर कॅप्टन्सी सोडणार आहे. स्वत: विराटने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे विराटनंतर टीम इंडियाचा पुढचा कर्णधार कोण असणार, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.

सर्वांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतल्याचं विराट सांगतो. “अर्थात, या निर्णयापर्यंत येण्यासाठी बराच काळ लागला. माझ्या जवळच्या व्यक्तींशी, रवीभाई, रोहित यांच्याशी खूप सारी चर्चा केली आहे. त्यानंतर मी या निर्णयाप्रत आलो आहे की ऑक्टोबर महिन्यात दुबईमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर मी टी-२० संघाचा कर्णधार म्हणून पायउतार होणार आहे. माझ्या निर्णयाविषयी मी बीसीसीआयचे सचिव जय शाह, अध्यक्ष सौरव गांगुली आणि निवड समितीच्या इतर सर्व सदस्यांसोबत बोललो आहे. भारतीय क्रिकेट आणि भारतीय संघाची सेवा मी अशीच करत राहीन”, असं विराटनं या पत्राच्या शेवटी लिहिलं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + 1 =