You are currently viewing गर्विष्ठ माना या नेहमीच शिवसेनाप्रमुखांच्या चरणी झुकल्या…!

गर्विष्ठ माना या नेहमीच शिवसेनाप्रमुखांच्या चरणी झुकल्या…!

भाजपला आता तालिबानी वाटणाऱ्या याच शिवसेनेने 1991 साली मुंबई वाचवली होती

आ.वैभव नाईक यांचे प्रत्युत्तर

1991 साली मुंबईत शिवसेना नसती तर आज जे शिवसेनेला तालिबानी म्हणत आहेत.त्याच हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेने मुंबई वाचवली होती. हिंदू लोकांना वाचविले होते. आजही मुंबईच्या जनतेला माहिती आहे की शिवसेना नसेल तर मात्र मुंबईत हिंदूंचे, मराठी माणसांचे काही खरं नाही. त्यामुळे भाजपने शिवसेनेला तालिबानी संस्कृती म्हटले तरी जनता ही शिवसेनेच्या पाठीशी राहील असे जोरदार प्रत्युत्तर शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले आहे.

आ. वैभव नाईक पुढे म्हणाले, खरतर बाळासाहेबांच्या पुढे अनेक लोकांच्या माना झूकल्या अनेक लोक नतमस्तक झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, प्रणव मुखर्जी असतील किंवा त्या वेळेची ग्यानी झेलसिंग असतील. देवेंद्र फडणवीस यांचा बाळासाहेबांचे स्मारक होण्यासाठी मोठा हातभार आहे हे आम्ही नाकारत नाही. देवेंद्र फडणवीस येणार म्हणून स्मारकाच्या ठिकाणी परवानगी दिली. माञ स्मारकाच्या ठिकाणी येऊन सुध्दा नारायण राणेंनी टीका करण्याचे काम केले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ते आवडले नाही म्हणून त्यांनी गोमूत्र शिंपडले ते बाळासाहेबांचे कार्यकर्ते होते.
बाळासाहेबांचे निधन झाले त्या वेळी देशातील लाखो जनता त्याठिकाणी आली. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री यांनी बाळासाहेबांचे अंत्यदर्शन घेतले. परंतु नारायण राणेंना त्या वेळी तीथे येण्याची हिम्मत झाली नाही.आज मात्र केंद्रीय मंत्री पदाच्या पदराआड किंवा भाजपच्या पदराआड दर्शन घेतले. पण दर्शन घेताना सुध्दा त्यांना बाळासाहेबांचे विचार कधी समजले नाहीत. अश्याना घेऊन भाजप वाढत असेल तर त्याचा लखलाभ भाजपला व्होवो. माञ शिवसेना आजही ठामपणे उभी आहे आणि उद्याही राहील.

नारायण राणेंची जनआशिर्वाद यात्रा शिवसेनेवर टीका करण्यासाठीच

महाराष्ट्रात, कोकणात मोठ्या प्रमाणात पुर आला लोकांचे मोठे नुकसान झाले. यावेळी राणे आले आणि मला पंतप्रधानांनी पाठवलय म्हणून सांगितले आणि पूरग्रस्ताना मदत करू म्हणाले माञ विमानतळावर उतरल्या पासून राणेंनी शिवसेनेवर टीका करण्याचे काम केले आहे. राणेंनी मदत करू म्हणाले माञ गेल्या दिड महीन्यात राणेंनी पूरग्रस्ताना दमडी सुद्धा दिली नाही कोकणात एखादा नवीन प्रकल्प किंवा एखादी नवीन योजना आणण्याची घोषणातरी केली का? फक्त शिवसेनेनेवर टीका करण्यासाठीच ही जन आशीर्वाद याञा आहे का? असा सवाल आ. वैभव नाईक यांनी करत या याञेला लोकांचा आशिर्वाद मिळणार नसून लोकांचा आशिर्वाद राणेंनी दहा वर्षां पुर्वीच गमावला आहे. येथील आमदार आणि खासदार शिवसेनेचेच निवडून आलेत त्यामुळे कोकणातील जनतेचा आशिर्वाद राणेंना मिळाला नाही आणि या पुढच्या काळात सुद्धा तो मिळणार नाही. राणे भाजपच्या पदराआड राहून मोदीजींचं नाव सांगून शिवसेनेवर आरोप करण्यासाठी फिरत आहेत. भाजपच्या काही लोकांना अजूनही शिवसेना आणि भाजपने एकञ यावे असे वाटते म्हणून भाजपचे नेते शिवसेनेवर आरोप करीत नाहीत माञ अशा बाडग्यांना शिवसेनेवर आरोप करण्यासाठी ही जनआर्शिवाद याञा असल्याचा आरोप आ.वैभव नाईक यांनी केला आहे.

आशीर्वाद घेण्यासारखा भाजप पक्षात कोणी थोर पुरुष आहे असे राणेंना वाटत नाही

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे जगविख्यात थोर व्यक्तिमत्त्व आहेत.त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात भाजप पक्ष वाढला.मात्र आताची भाजप बाळासाहेबांच्या शिवसेनेवरच आरोप करून आपली राजकीय पोळी भाजून घेत आहे. बाळासाहेबांची शिवसेना संपविण्याचा नारायण राणेंनी विडा उचलला होता.काल त्याच नारायण राणेंनी बाळासाहेबां प्रति आदर भावना व्यक्त करून त्यांचा आशीर्वाद घेतला. खरंतर आशीर्वाद घेण्यासारखा भाजप पक्षात कोणी थोर पुरुष आहे असे राणेंना वाटत नाही त्यामुळेच त्यांना बाळासाहेबांच्या समोर नतमस्तक व्हावे लागले.
वस्तुस्थिती पाहता नारायण राणे आता बाळासाहेबांबद्दल कितीही आत्मीयतेची भावना व्यक्त करत असले तरी बाळासाहेब हयात असताना त्यांना त्रास देण्याचेच काम नारायण राणेंनी केले. त्याचप्रमाणे थोर पुरुष असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करण्याचे काम राणेंनी केले. मात्र शिवसेनेने या थोर पुरुषांचा आदर्श घेऊन काम केले.राणे ज्या मुंबई महानगरपालिकेवर आरोप करत आहेत त्याच मुंबई महानगरपालिकेने ही दोन्ही स्मारके उभारली आहेत.त्यामुळे एकेकाळी या थोर पुरुषांवर टिकाकरून पुन्हा त्यांच्याच पायावरच नाक घासण्याची राणेंनी संस्कृती सर्वश्रुत आहे असा टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + 15 =