You are currently viewing रत्नागिरी कोल्हापूर महामार्ग अजून ५ दिवस राहणार बंद

रत्नागिरी कोल्हापूर महामार्ग अजून ५ दिवस राहणार बंद

रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर साखरपा ते आंबा या दरम्यान आंबा घाटात १२ ठिकाणी दरड कोसळल्यामुळे व ३ ठिकाणी रस्त्याचा भाग तूटल्यामुळे महामार्गाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे अजून ५ दिवस दुरुस्तीसाठी हा रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. नुकत्याच कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांना पुराचा तडाखा बसला. तर डोंगराळ भागात दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. रत्नागिरी व कोल्हापूरला जोडणाऱ्या आंबा घाटात तब्बल १२ ठिकाणी दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती व दगडांचा ढिगारा रस्त्यावर आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + eleven =