You are currently viewing वेंगुर्ले शहरातील गटारे पावसाळ्यापूर्वी साफ करा – राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

वेंगुर्ले शहरातील गटारे पावसाळ्यापूर्वी साफ करा – राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

वेंगुर्ले

वेंगुर्ले नगरपरिषदेने पावसाळा 7 ते 8 दिवसांवर आलेला असताना शहरातील सर्रासपणे सर्वच पावसाळी पाणी निचऱ्याची गटारे अद्याप मोकळी केलेली नाहीत. ती त्वरीत साफसफाई करावी अशी मागणी वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सत्त्यवान साटेलकर यांनी लेखी निवेदनाव्दारे नगरपरीषदेकडे केली आहे.
वेंगुर्ले नगरपरीषदेकडे सादर केलेल्या निवेदनात, वेंगुर्ले नगरपरिषदेने गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून भुमीगत विद्युत वहिनी, पाण्याची लाईन तसेच गँस लाईन टाकताना खोदाई केलेल्या भागातील माती गटारात पडून गटारे भरलेली आहेत. तसेच अवेळी पडलेल्या पावसाने सर्वच भागातील गटारे गाळाने भरलेली आहेत. मान्सून कांही दिवसांत येण्याची शक्यता असल्याने पावसाळी पाणी निचरा होण्यासाठी गटारे साफ असणे गरजेचे आहे. दरवर्षी हि गटारे लवकर काढली जात होती. पण यावेळी फार वेळ झालेला आहे.

वेळीच गटारांची साफसफाई न झाल्यास पावसाचे पाणी गटारांतून रस्त्यावर व रस्त्यावरून घरात जाऊन नुकसान होण्याची तसेच स्वच्छ शहरात अस्वस्थता निर्माण होणारी असल्याने तातडीने शहरातील सर्व पावसाळी पाण्याचा निचऱ्यासाठी बांधलेली गटारांची साफसफाई करुन नागरिकांना होऊ शकणारा त्रास दूर करावा. अशी मागणी वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सदस्य नितीन कुबल सह शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 4 =